किती काळ गेले असे हे सरूनी...
कितीदा तुला पाहिले ;विस्मरूनी..
तरीही पुन्हा ;काळजाला छळूनी ;तुझे नाम ते अंतरी राहिले ....
तुझे भास होता; मनाला म्हणावे ;
"विसरूनी जा रे ;नसे सत्य काही "
तरीही मनाला कळेना कळेना ;
तुझे गीत त्याने कसे विस्मरावे ?...
किती यत्न केला ;तरीही विरेना;
असा शोक आता ;उरांतून वाहे;
उगा श्वास येती ;शरीरांत आता;
परी प्राण अस्वस्थ तेथे रमेना..!
तुला आज माझी नसे आस काही ;
तरीही भासते पाश काही अजुनी;
उरे दोन जीवांत अपुल्या तरीही ;
कुठेना कुठे भेट होईल अजुनी ;
असे स्वप्न नेत्रांमध्ये राखले...
तुझे नाम ते अंतरी राहिले.....
................................लेखन -हर्षल,,
hee kalpanik kavita aahe.......kavila mhanje mala ugaach "kon re tee mulgi?" ase prashn vicharu nayet.......
ReplyDeletemast aahe :)
ReplyDeletethanks...!!
ReplyDelete