त्या सुरांचे गाव माझे ;ते सुखांचे ठाव माझे
हरवले आता कुठे..
पाहिले जे स्वप्न तेंव्हा ..
हरवले आता कुठे?
भोवताली माणसांच्या उग्र जत्रा रंगल्या ;
शांततांचे भान त्यातून ..
निसटले आता कुठे?...
एकटे चालावयाचे ;
कारणे त्याची मनाला ;
हरवले आता कुठे..
पाहिले जे स्वप्न तेंव्हा ..
हरवले आता कुठे?
भोवताली माणसांच्या उग्र जत्रा रंगल्या ;
शांततांचे भान त्यातून ..
निसटले आता कुठे?...
एकटे चालावयाचे ;
ठरवले नव्हते कधी..
सोडूनी सारेच गेले;
शोधुनी आणू कुठे..??
कल्पनांचे विश्व सारे
मस्तकातच राहिले..
वास्तवाचा स्पर्श देऊन;
उतरवू आता कुठे..??
ध्यास होते अल्प काही ;
विरून तेही पार गेले;
स्वप्न सुंदर जीवनाचे ;
उमटवू आता कुठे..?
जन्म काही मानवांचा ;
दुःख वाहत चालतो..!!
आपुल्या डोळ्यांसमोरी ..
हाल अपुले पाहतो..!!
कारणे त्याची मनाला ;
समजवू आता कुठे.......??
.......................................लेखन -हर्षल.
i wrote this poem in mere 10 mins...when i saw a man totally out of boundaries of life ...exceptionally filled with sorrow....i jst gave words to his quiet expressions...if his eyes were able to speak they would have said nearly same.as i expressed..!!
ReplyDelete