उरी श्वास तेंव्हा किती धुंद होते;
किती मोह हृदयात उमलायचे..
जरी पाहिले रोज आकाश तरीही;
नवे होऊनी रोज भेटायचे..
किती शांत आयुष्य होते मनाला..
सुखांचे किती शोध लागायचे;
जरासे बदलता मनाचे किनारे ;
नवे स्वप्न क्षितीजास उगवायचे..
परार्थास तेंव्हा खरा अर्थ होता.
मना स्वार्थ जेंव्हा न उमगायचे
जरा दुःख होता कुणाला कसेही;
तरी लोचनी नीर दाटायचे..!!!
किती स्वस्थ तेंव्हा ..किती शांत तेंव्हा ..
दिनांमागूनी दिन लोटायचे..!!
सूखे नेत्र मिटता..निशेच्या प्रवाही..
किती स्वप्न-संभार दाटायचे...!!
किती मुक्त होते ..मनांचे पिसारे..
जणू मोर होउन नाचायचे..!
सुखांच्या उमलत्या प्रदेशांत तेंव्हा;अविश्रांत स्वानंद लाभायचे..!!..लेखन :--- हर्षल
जगायास तेव्हा खरा अर्थ होता निरर्थास ही अर्थ भेटायचे..written by soumitra ......based on the theme and mode of writing of this poem by soumitra ;i have written the poem in the post...in a sense it may seem as a copy..but the design is different totally.......by harshal!!
ReplyDelete