Sunday, October 30, 2011

देशस्थ आणि कोकणस्थ भाग ३ [भांडण]..!!

प्रसंग ४:- उग्र  मतभेद!!
स्थळ :पुणे शहरामधील एक वाचनालय          :-२००५ चा जुलै महिना    वेळ :- सकाळी
                                                   सुमारे ११ची !
{ **एक देशस्थ [श्री.अत्रे] आणि एक कोकणस्थ [श्री.गाडगीळ] दोन मित्र(?) एकमेकांना भेटलेत   ..}

"काय म्हणतोस अत्रे बर्याच दिव्सांने भेटलास?.कधी घरातून बाहेर पडत जा ;वाचनालयाला ईतकी फी भरतोस आणि पुस्तके बदलायला अगदी क्वचितच येतोस!!..थोडा हिशेब तरी ठेव..हेहेहे "



"ओहो गाडगीळ !!कसा आहेस ?..कसले हिशेब ?..चायला मी हिशेब करावे ;फी वसूल  करावी
 म्हणून लायब्ररी नाही वापरत...चांगली पुस्तके वाचण्याचा छंद आहे म्हणून लावतो ;तुमच्यासारखे वसुली बाज लोक नाहीयोत आम्ही !!साला ..सगळीकडे फक्त फायदा आणि वसुली काय रे बघता ?मन शुद्ध कर आधी ;आणि कसली फडतूस पुस्तके वाचतोस गाडगीळ तू !!..आणि ह्याला वाचन म्हणतोस;वसुली म्हणतोस ??..टीनपाट खोपडीच्या!!""  




"साहित्याची आवड म्हणतात त्याला ;देशस्थांच्या डोक्याबाहेरची गोष्ट आहे ती !!..आणि टीनपाट कोणाला म्हणतोस रे अक्करमाशा ?..चित्पावन म्हणजे काय तुमच्यासारखे मट्ठ नाहीयेत !..उच्च विचार आणी समर्पक व्यवहारी आचार  म्हणजे चित्पावन ;म्हणजे आम्ही!! ;कळले का रे काळपट माणसा ??"


"चायला ..उच्च विचार ??साहित्याची आवड ?? ते पण तुमच्याकडे ?अरे, पांढरट पोपटनाक्या;साहित्य म्हणजे काय ते माहितीये तरी का,चीचुन्द्र्या ?? घार्या डोळ्यांवर चष्मा लावून आणि सडपातळ अंगात झब्बा घालून चीचुन्द्रीसार्ख्या आवाजात गाण्याचे प्रोग्राम केले कि लगेच स्वतःला साहित्यिक म्हणवता तुम्ही ??..थापा पुण्याबाहेरच्या लोकांना मार रे !! तुमच्या सगळ्या आवडी माहितीयेत मला ;समर्पक आचार म्हणे !! काहीही म्हण गाडगीळा ;कोकणस्थ चित्पावन म्हणजे फुल भंकस पब्लिक रे तुम्ही "


"अहो मिस्टर व्यवस्थित म्हणजे भंकस पब्लिक काय;.आणि गाणे म्हणायला बारीक आणि गोडच आवाज लागतो ;आहे तो आमच्या लोकांकडे ,तुमच्यासारखा भसाडा आणि चार मजले जमीनदोस्त करणारा आवाज नसतो आमचा..!!...पण जंगली रेड्यांना संगीतातले काय कळणार म्हणा!!..झोपा काढा झोपा, तुम्ही चार वेळ हादडून आणि दुसर्याच्या कर्तृत्वाला नावे ठेवा ..मद्दड मेंदूच्या माणसा एक तरी गुण आहे का आमच्यासारखा तुमच्यात ??!!
?"


"गुण आहेत रे पण तुमच्यासारखे ते ओतू जाणारे अवगुण नाहीयेत; हावरट तुसडेपणा नाहीये;
 गुण म्हणे गुण?..कसले गुण रे ?..चावटपणा,स्वार्थीपणा ;आगाउपणा;एकलकोंडेपणा;भांडखोरपणा;कवडीचुंबकपणा हे गुण ?? आणि  ह्या स्वभावाचा केवढा ताठा;केवढा अभिमान तुम्हाला ?? ;अभिमान कसला गर्व म्हणूयात का ,गर्व ?..आता बोल ना ;मेणचट-पुतळ्या ??"


"अरे,डांबर-काळ्या ;काही गुण असले ना तरच ताठा येतो ;तुम्हा देशस्थांत काय गुण आहेत ते ठावूक आहे मला;आमचे गुण अवगुणच वाटणार रे तुम्हाला ;बत्थड माणसा !"


"अस का ?..अरे पांढरट रंगाच्या हिरवट माणसा आमच्या गुणांची साक्ष ईतिहास देईल...तुमचे  नुसतेच अभिमान ;आणि आगाउपणे !!..काम काही नाही!!"


"अत्र्या ;आहोत आम्ही गोरे ;कारण आम्ही तेजस्वी आहोत;स्वाभिमानी आहोत !!तुमच्यासारखे करपलेले बेढब काळपट नाहीयोत;मेंगळट आणी सुस्त ;बीनमणक्याचे अजगर नाहीयोत रे फितूर माणसा !!..आणि ईतिहासाच्या गमजा कुणाला सांगतोस रे?..आम्ही घडवलाय तो ..वाच पुस्तके जरा !!"


"वाचलीयेत रे रेम्याडोक्या ;सगळी वाचलीयेत .आणि फितूर कुणाला म्हणतोस रे निलाजर्या ??.!!..म्हणे ईतिहास घडवला .दोन चार सुधारक आणि पेशवे सोडले तर आहे काय ईतिहासात तुमचे?"


"सगळ्या चळवळी आम्ही  केल्यात अत्र्या!!..नाव घ्यायला गेलो तर तोंड अजून काळे ठिक्कर पडेल तुझे..!!"


"अरे कसल्या चळवळी रे गाडगीळ्या ?..चळवळी नाही वळवळी केल्यात नुसत्या सर्वत्र !!..म्हणे चळवळी केल्यात ..आधी साधे सरळ चाला ;कन्जूसांनो!!..मग वळवळ का चळवळ काय ते करा !!"


"कंजूस कोणाला म्हणतोस रे उधळ्या ?..धोरणी आहोत आम्ही !!धोरणी..!!बदाबदा अन्न करून फेकत नाही तुमच्यासारखे ..वाट्टेल तसे बेहिशेबी नसतो तुमच्यासारखे..!!मला सांगतोय वळवळ करा..!!अरे तुम्ही तेवढी तरी करून दाखवा ना!!..आळशी;सुस्ताड प्राणी कुठचे!!"


"अरे आम्ही केलीच ना तर डायरेक्ट क्रांती करतो;वळवळ ;चळवळ नाही ..!!आणि तुम्ही धोरणी ??
हिशेबी??..चार आणे काढताना आव लागल्यासारखे चेहरे करता तुम्ही; जेवतांना मोजून पोळ्या करणारे दीड अकली लोक तुम्ही !!;अरे आम्ही उदार आहोत दिलदार आहोत..उगाच फालतू हिशेबात आयुष्य नाही घालवत !!..आणि आमच्या शांत स्वभावाला सुस्त म्हणतोस गाडगीळ्या ?"


"तुम्ही शांत नाही ;मक्ख आहात मक्ख !!..आम्ही व्यवस्थित आहोत म्हणून सगळं मोजून मापून करतो..अत्र्या,तुमच्यासारख नाही बिनडोक वागणं आमचं..!!म्हणूनच तर ईतके तीक्ष्ण आणी विद्वान लोक जन्माला आले आमच्यात !!"


"तीक्ष्ण आणी विद्वान ??..कंजूस आणी मक्खीचूस म्हण त्यापेक्षा ..चार दोन अपवाद सोडले तर कोण आले रे महान लोक जन्माला तुमच्यात ?"


"सगळे समाज सुधारक ;स्वातंत्रवीर आणी प्रत्यक्ष पेशवे काय देशस्थ होते काय रे अत्र्या ??"


"अरे मी म्हणालो ना..नुसते वळवळ करा लेकांनो..भरीव काही काम नकोच तुम्हाला !!"


"अरे आम्ही समाज सेवा केलीये;समाजाला  जागे केलेय !!तुम्ही काय दिवे लावलेत रे ?"


"ए गाडगीळ्या;म्हणे समाजाला जागे केलेय!!..आधी त्याला झोपवले तुम्हीच ना ?"


"अस्स?..पण निदान जागे तरी केले;तुम्ही काय दिवे लावले ब्राह्मण असून ते सांग !"


"अरे आम्ही असे दिवे लावलेत कि त्याचा प्रकाश उधार घेऊन अजून जगताय तुम्ही .."


"असे कोण महान लोक जन्माल घातले रे तुम्ही"


"सगळे संत बघ ;मक्खीचूस माणसा !!..एकजात देशस्थ होते !!..संत रे संत..!! वळवळे नाहीतर चळवळे नाहीत ..डायरेक्ट संतच !!..ही लेव्हल आहे आपली..डायरेक्ट संत.!!.आता बोल की कोकण्या ?? ""


"अरे हवेतच  रहा तुम्ही ,हवेतच !!संत असतात चार आणि त्यांची नावे काढत स्वताची पाठ थोपटा घाट्यान्नो!"




"मग सुधारक आणि स्वातंत्र्यवीर काय लाखात मोजावे ईतके होते काय रे कोक्या ??"


"अरे माठ्या; आम्ही संस्कारी आहोत ;तुमच्यासारखे गबाळे आणी बेशिस्त नाही"


"कोणाचे संस्कार रे कोबरटा?..कसले संस्कार ?..सासू सासर्यांना बाहेरची पायरी दाखवण्याचे आणी जावयांना घरजावई करण्याचे ??;कि चीक्कुपणे आणी स्वार्थीपणे स्वताच्या पोळीवर तेवढे तूप ओतून घेण्याचे ??"


"ए वाह्यात माणसा,वाट्टेल ते आरोप नको करूस,आम्ही शिस्तबद्ध वागतो न तेच सलतंय तुम्हाला ..!!सगळ्या गोष्टीत घोळ घातले की मगच बरे वाटते ना तुम्हाला ;वाट्टेल तसे खायचे ;झोप काढायच्या ;मंदपणे जगायचे आणी फुकटचे सल्ले द्यायचे येवढेच करा तुम्ही !..सुधारणार नाही कधी तुम्ही देशस्थ माणसे !!"
  
"जे मनाने आधीच सुधारलेत त्यांना तुम्ही अजून काय सुधारणार रे ?..स्वताकडे बघा आधी !!"


"अच्छा!!..तुम्ही मनाने सुधारलेले??..अरे मनाने बोथट आहात बोथट!!कुशाग्र बुद्धी नाही तुमची !,शिका आमच्याकडून काहीतरी "


"तुमच्याकडून काय शिकणार ?.लुच्चेपणा??. तुम्हीच साधेपणा शिका आमच्याकडून !!"


"ईतकी वाईट वेळ अजून आली नाहीये चित्पावनांवर ;कि तुमच्याकडून शिकावे ..!!"


"मग देशस्थांची सुद्धा बुद्धी अजून ईतकी भ्रष्ट नाही झालीये कि तुमच्याकडून सल्ले घ्यावेत !!"


"एक मिनिट अत्रे ;आपण असेच भांडत राहिलो तर निकाल लागणार कसा ?"


"हो रे गाडगीळ ;थांब ,कोणाला तरी विचारुयात..तो बघ तिथे एक माणूस आहे मघासपासून ऐकतोय वाटत आपला वाद..त्यालाच विचारुयात .."


"चालेल ;मला तरी तो माणूस कोणी मोठा आणी विद्वान वाटतोय ;चल ,विचारू त्याला "



तेवढ्यात तो माणूस स्वतच जवळ येतो ..आणि दोघांनी काही विचारण्याआधीच म्हणतो ...

""तुमच्या दोघांत तोच जिंकलाय जो सगळ्यात जास्त मूर्ख आहे..!!आणि माझ्या मते तुम्ही दोघेही जिंकलेले आहात..अर्थात महामूर्ख देखील आहात !!;विनाकारण वितंडवाद करणारे संतही नसतात आणि सुधारकदेखील..आणि हो..असेच भांडत राहिलात तर दोघेही सुधारणार तर नाहीच पण अजूनच बीघडाल !..एकेमकांना समजून घेतलत तर शहाणे राहाल नाहीतर अज्ञानातच जगाल आणि तसेच मराल.!! 
लक्षात ठेवा :-एकमेकांशी संवाद करून दोष समजून घेणे आणि ते सुधारणे हाच खरा सहकार !!..
         आणि नुसतेच एकमेकांचे दोष दाखवणे आणि टीका करणे म्हणजे  संपूर्ण अनाचार !!..


काय करायचं ते तुम्हीच ठरवा!!!...................




-----विशेष सूचना:---हा प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिलेला असून केवळ काही शब्द;पात्रांची नावे    आणि संवाद वगळता सुमारे ८० ते ८५% जसाच्या तसा लिहिलेला आहे..!!हे लिहिण्यामध्ये काही ठिकाणी अतिशयोक्ती असली तरी त्यातला काल्पनिक भाग अत्यल्प आहे..ब्राह्मण वर्णाने एकसंघ राहावे ह्या मताचा मी असल्याने ..सर्व ब्राह्मण मी समान दृष्टीने पाहतो...मला भेद समजतात पण मान्य होत नाहीत ;ते भेद मोडून ही ब्राह्मशक्ती एक व्हावी अशीच ईच्छा माझी सदैव असते व राहील सुद्धा  !!...त्यामुळे अर्थातच हे संवाद  लेखन कोणाही कोकणस्थ अथवा देशस्थ मनुष्यास दुखावण्यासाठी हे लिहिलेले नसून;उलट अशा निष्कारण कटुते पासून सार्यांनीच बोध घ्यावा व असे प्रकार घडू नयेत म्हणून हा लेखन प्रपंच आहे !!तरीही चुकून कुणास तसे वाटून वाईट वाटले असल्यास मी त्यांची क्षमा मागतो  !!...


..................लेखन ------ ----  हर्षल !!

..................देशस्थ आणि कोकणस्थ ...भाग २...! [ स्वानुभव ].........

प्रसंग ४:---
स्थळ :-ज्योतिषी अभ्यंकरांचे घर ; पुणे
वेळ:-सकाळी ११ चा सुमार ..


"आलास का रे ?..देशपांडे न तू?"

"होय ..पाया पडतो !!"

"शुभमस्तु !!..बैस !!.. हा तुझा मित्र शैलेंद्र म्हणजे नातू हो माझा!!  त्याचा काल फोन आला होता ;म्हणत होता देशपांडे म्हणून मित्र आहे त्याला भेटायचं तुम्हाला ..!!..हर्षल नाव ना तुझे ??..छान ..पत्रिकेतील हर्षल ग्रहासारखाच अकस्मात आलास ..असो..काय करतोस सध्या??"

"मी डोंबिवलीस असतो....आताच तृतीय वर्षात गेलो आहे अभियांत्रिकीच्या! civil engineering 
शैलेन्द्र आणि मी दोन वर्षापूर्वी iit च्या क्लास मध्ये भेटलो होतो..तो वर्गमित्र नसला तरी स्वभावाने चांगला असल्याने फोनवरून ओळख अद्याप राहिलीये आमची..आता सहा महिन्यांपूर्वी भेटला तो मला अचानक रेल्वे मध्ये ..आणि बोलता बोलता तुमच्याबद्दल सांगितले..ते ऐकून आपल्याला भेटायला यावेसे वाटले..काल मामाकडे येणार होतोच पुण्याला म्हणून शैलेन्द्र ला विचारून पत्ता घेतला ..१० दिवस मुक्काम आहे पुण्यात ..तुम्हाला थोडा त्रास दिला या वयात म्हणून क्षमा करा परंतु तुमच्यासारखे ज्ञानी आता भेटणार नाहीत आणि माझ्यासारख्याला बर्याच गोष्टी तुमच्यासारख्यानशिवाय समजावणारे तपोवृद्ध लाभणार नाहीत म्हणूनच वेळ न दवडता आलोय...अशा आशेने कि आपण काही ज्ञान देऊ शकाल मला ..!!"

"[हसून]..अगदी मोठ्या माणसांसारखा बोलतोस रे..!!.जेवण झालंय का?..नाहीतर जेवूनच जा ..आणि कसलं ज्ञान हवंय तुला ?..ज्योतीषाच??..कि अजून काही ??"

"नाही गुरुजी ; एकंदरच ब्राह्मण ईतिहास आणि संपूर्ण हिंदू समाजाचा आणि मानवी समाजाचा ईतिहास यावर मी काही स्वतंत्र आणि मूलभूत विश्लेषण केलंय..पुराव्यांसहीत ..परंतु प्रचलीत ईतिहास फार उथळ ;खोटारडा आणि सवंग वाटतो त्यापुढे ..वेद ,पुराणे आणि अनेक मूलभूत ग्रंथ वाचल्यावर मी भारतीय प्रचलीत ईतिहास पाहतो तेंव्हा आपल्याच माणसांची कीव येते..त्यासंबंधी बोलायचय आपल्याशी ..शिवाय ज्योतिषाचे काही नियम आणि योग यांवर सुद्धा..!!"

"अरे तू इंजिनियर होणारेस का प्राच्य-विद्या -पंडीत ?..आणि तू म्हणतोस तितका सोपा विषय नाहीये ईतिहास !..आणि ज्योतीषाच म्हणशील तर हा एक अथांग सागर आहे बाळा..!!शिवाय तुझे ज्ञान किती आहे हे अजून तपासावे लागेल !!"

"परीक्षा घ्या माझी ;त्याचसाठी आलोय इथे .!!.आणि विद्यालयीन अभ्यास म्हणाल तर त्यापेक्षा जास्त आनंद आणि समाधान मला ह्या क्षेत्रात मिळेल असे वाटते..!!नुसता इंजिनिअर होऊन कोरडा माणूस बनण्यापेक्षा काही अधिक उत्तम करावे आणि अधिक धर्म जाणावा असे वाटते..तुम्ही सांगाल मला माझ्या प्रश्नाची उत्तरे?..अर्थात तुम्हाला माझ्या पात्रतेबद्दल खात्री झाल्यावरच..!"

"सांगेन बाळा !!..ठीक आहे..एक मिनिट हां!!..हं ही घे एक पत्रिका ;आणि सांग काय सांगशील यावर ??.."
[अर्ध्या तासाने ]

"मी लिहिले आहे गुरुजी ;माझे या पत्रीकेबद्दल्चे परीक्षण ..बघा !!

[ते वाचतात आणि वाचून झाल्यावर ]

"इतक्या लहान वयात कुठे शिकलास रे बाळा??.उत्तम . .पण राहूचा कुयोग नक्की होईल असे वाटते?
पुढे काय लिहिलयस ?..हो बरोबर.. कारण चंद्र नवमेश आहे आणि सूर्य पराक्रम स्थानात ...छान !!अंश योग येतात वाटत ??..असा विद्यार्थी फार पूर्वी एक होता ..तुझ्यासारखा ४० वर्षांने दुसरा बघतोय ..!..अजून बरंच शिकशील ..उपासना करतोस ना ??..छान ..!!"

"मग सांगाल मला ..माझी उत्तरे ..??"


"अवश्य !..काय हवंय विचार..!!..ईकडे बघ ती ट्रंक दिसतीये ना? ती काढ त्यात जुनी पुस्तके आहेत ..आता दुर्मिळ आहेत ती ..पण झेरोक्स मारून घे हवे ते पुस्तक..बरीच उत्तरे त्यात मिळतील "

"आणि गुरुजी अजून एक ;सध्या काही कोकणस्थ ब्राह्मणांकडे एक सीडी असते ;मी पाहिलीये ती! !..त्यात ईतिहास आहे त्यांचा असे ते म्हणतात ...पण तो पर्शुरामापासून चालू झालेला दाखवलाय शिवाय गोत्रांचे ;प्रवरांचे आणी आपल्या वेदांशी साम्य दाखवणारे उल्लेख अत्यल्प आहेत त्यात...केवळ ३५०० वर्षाचा ईतिहास आपला आहे असे अत्यंत धादांत खोटे प्रचार सुरु आहेत ..आणि अज्ञानामुळे बरेच लोक ते खरे मानतायेत..!!..आपल ईतिहास किती जगड्व्याळ आहे हे कसे समजेल यांना ?..भेदांच्या भिंती कशा कोसळतील ब्राह्मण समाजातल्या ??..हा भारतीय समाज कसा स्वताचा एक धर्म आणि एक तत्त्व समजेल ?..आणि कधी?.""

"आपला ईतिहास फार प्राचीन आहे,देशस्थ ;कोकणस्थ आणि तत्सम भेद अर्वाचीन आहेत..समस्त भारतीय ब्राह्मण ;क्षत्रिय आदी केवळ चार वर्णांतच विभागले होते..कालांतराने आणि कलियुगाच्या आगमनाने चार वर्णांच्या चार सहस्त्र जाती झाल्या..आणि जातीच स्वताला मूलभूत समजू लागल्या..भेद झाले;धर्म लयास गेला;ब्राह्मण भ्रष्ट झाले;समाज अज्ञानमय झाला..यंत्र प्रगती विवेक देऊ शकत नाही.तुला हेच म्हणायचेय ना??....".खूप बोलता येईल ..पण उद्या ये !!..आणि आत्ता जेवूनच जा हो.!!.कोकणस्थ आडनाव असले  तरी खरा ब्राह्मण आहे [हसतात ]..आमच्या पुण्यातील काही ईतर नुसत्याच नामधारी चित्पावन ब्राह्मणांसारखा नाहीये हो मी ..!!.

"[उतावीळपणे] अगदी हेच गुरुजी हेच .! आणि अजून बरेच काही !!.आणि [हसून ]तुम्हाला आजच्या रूढ व्याख्येप्रमाणे कोकणस्थ कोण म्हणेल ?..हो पण सत्त्वशील ब्राह्मणाचे उदार हृदय नक्की आहे इतके मात्र खरे...!!

"अरे देशस्थ आणि कोकणस्थ काय किंवा ईतर पोटजाती काय ,आंधळे झालेत सगळे,बहुतेक तर नुसते गोत्राने आणि आडनावाने ब्राह्मण उरलेत,अनाचार आणि स्वार्थ हे ब्राह्मणाचे दोन शत्रू असतात..त्यांना शरण गेले कि अशी भयंकर स्थिती उत्पन्न होणारच..आणि अजून कलियुगाचा बराच शेष आहे,अजून बरेच दुर्धर प्रसंग येणारेत समाजांवर..मानवतेवर ..!!.अनेक देशस्थ काय किंवा चित्पावन काय किंवा अन्य कोणी ब्राह्मण काय सगळेच आत्मविद्येपासून दूर होत गेलेत..आणि सदाचारापासून फारकत घेतायेत !!..आजकाल तर कुणाला ब्राह्मण म्हणावे असा प्रश्न पडेल !!..ब्राह्मणांनी धर्म काळाच्या ओघात फक्त पोथ्यांद्वारे ;पाठांतराद्वारे जिवंत ठेवला ईतकेच पुण्यकर्म घडले त्यांचे हातून..सुदैवाने..!!..पण काल-पुरुषाचा प्रभाव त्यांवरही पडलाय आणि म्हणूनच ,तेही फक्त जाती ;पोटजाती आणि ईतर संकोच केलेल्या रूढी यांचे भक्ष्य ठरलेत !..उदाहरण म्हणजे,कोकणस्थ कंजूस;धोरणी;आणि हुशार किंवा चलाख बुद्धीचे असा एक समज आहे ;त्यात सत्य ईतकेच कि कालमानाने त्यांच्या पिढ्या विशिष्ठ संस्कार आणि विचार यांच्या चक्रात राहिल्या ;परंतु सुज्ञ ब्राह्मणाने असा विचार करावा कि परंपरा ;रूढी कालमानाने उत्पन्न होतात आणि धर्म सनातन असतो..!! ज्ञानी 'ब्राह्मण' म्हणून श्रेष्ठ होणे महत्वाचे कि लहान सहान गुण-अवगुण यांवरच स्वताचे विशिष्ठ ब्राह्मण्य मिरवायचे हे ज्याला समजेल तोच ब्राह्मण अशा पोट भेदांच्या पार जाऊ शकेल !!आपल्या  विविध ब्राह्मण पोट-जातीमध्ये जो भेद आहे तो 'ब्राह्मणत्वाचा'नाहीच ..भेद असलाच तर तो केवळ प्रादेशिक वैशिष्ट्यांचा आणि तत्सम काही लहान सहन परंपरांचा ..आणि सध्या लोक "ह्या" वैशीष्ट्यालाच ब्राह्मणत्व समजू लागलेत ..हेच अत्यंत घोर दुर्दैव आहे !हा अखंड ब्राह्मण समाज आता केवळ पूर्वपुण्याईवर ;आनुवंशिक गुणांवर सध्या तरी टिकून आहे..पण ही पुण्याई ;हे भाषावैभव ;हे उच्चारज्ञान;ही वाणी शुद्धता;गोत्र-प्रवरादी ज्ञान हे सुयोग्य विवेकाशीवाय आणि शुद्ध कर्मांशीवाय टिकून देखील राहणार नाही..पुढच्या पिढ्या तर कसलाच अर्थ समजू शकणार नाहीत ..!!..लक्षात ठेव..जो मनुष्य ज्ञान ;सत्कर्मे आणि निस्वार्थ बुद्धीने आयुष्याचा निर्वाह करतो ;ज्याचे आचरण पवित्र्याच्या ध्यासातून सतत अधिकाधिक उन्नत होत जाते असाच मनुष्य म्हणजे खरा ब्राह्मण होय.!!.नाहीतर बाकीचे सगळे म्हणजे समर्थ रामदासांनी सांगीतलय न तसे .."जन्मा येऊन; जननी वायाची कष्टविली"..नुसते नावाचे ब्राह्मण !!..'ब्राह्मणत्व' हे आकलन व्हायला हवे !!स्वजातीचा वृथा अभिमान संकुचित करतो;उन्नत नाही!!..आजकाल हेच ब्राह्मणांना सांगायची वेळ आलीये ह्याहून दुर्दैव कोणते??.....असो!!
  ..फार जुने 'जाणते' आणि 'नेणते' लोक पाहिलेत मी बाळ;आता ८५ वय चाललंय सध्या..शरीर साथ देत नाहीये..पण तुझ्यासारखे तरुण बघितले कि अजून माझेच सिद्धांत मनात पुन्हा दृढ होतात;आशा वाटते;निद्रिस्त स्वप्ने आणि शुद्ध सद्गुण अजूनही मेलेले नाहीत यावर पुनःश्च विश्वास बसतो..!!थोडा उशीरा भेटलास पण ठीकाय, हरकत नाही..कदाचित ह्या आठवड्यानंतर परत भेटणारही नाहीस. नियती जरा खेळ करतच असते.ईश्वराशिवाय दुसरा त्राता वाटू नये म्हणजे ही नियती सुसह्य होते..असो..चला भोजन करून घेऊ..भरपूर खा हो बाळ,संकोच ठेवू नकोस,..आमच्या हिने पाने मांडली असतील ..चला.!! "    

[जेवण करून अभ्यंकर श्री आणि सौं च्या वृद्ध पायावर डोके ठेवून पुस्तके घेऊन निघतो...पुढचे चार दिवस अखंड चालणारे ज्ञान सत्र डोळ्यासमोर नाचत असते..मनात प्रकाश भरून जातो..आपण एकटे नाही आणि आपले विचार ज्ञानी मनुष्ये मान्य करतात हा विश्वास आणि दिलासा मनात भरून मी देवाचे आणि अशी ऋषीतुल्य माणसे मिळवून देणार्या माझ्या नशीबाचे आभार मानतो.!!..पुढचे चार सोनेरी दिवस स्वप्नासारखे डोळ्यात तरळत ..मी अभ्यंकर गुरुजीच्या जुन्या वाड्याच्या बाहेर येतो...प्रसन्न मनाने !!] 

...मी त्या आठवड्यात चार वेळा त्यांकडे गेलो....त्यांचे ज्ञान पहिले;निस्वार्थी वृत्ती पहिली!अनेक विषयांवर मनसोक्त चर्चा केली ;गोड-धोडाचे भरपूर जेवण केले ;अत्यंत क्लिष्ट विषय हाताळले ; उर फुटेपर्यंत शिकलो असे म्हंटले तरी अतिशयोक्ती होणार नाही .. ..तृप्त आणि भरलेल्या मनाने त्यांना अनेकवार नमस्कार केला..!!हे ऋण अनिर्वाच्य आहे..असे भाग्य क्वचित लाभते !!

 ..शेवटच्या दिवशी त्यांची सर्व पुस्तके परत केली..त्यातले एक दुर्मिळ पुस्तक  मला त्यांनी भेट दिले.....
.......आणि, मी त्यांच्या पाया पडून निघत असतानाच,आपला कंप पावणारा उजवा हात त्यांनी माझ्या तळहातावर ठेवला ..आणि दुसरा हात आधारासाठी माझ्या खांद्यावर ठेवला!!..आपल्या कापत असलेल्या उजव्या हाताने माझा उजवा हात धरून ठेवत मला म्हणाले "निघालास ना;आता भेट बहुदा नाही ..वर्षभर तरी पुण्यात येणार नाहीयेस तू..त्यानंतर येऊन उपयोगही  नाहीये..!!"मंद हास्य करीत ते शांतपणे म्हणाले .........आणि माझ्या डोक्यात लख्खकन वीज चमकून गेली !!...मला धक्का बसला ;मी विसरलो होतो ;ते एक महान ज्योतिषी सुद्धा होते..आणि महान ज्योतिषी यमाचे संकेत चांगलेच जाणतात..स्वतःबद्दलचे देखील!..व्यवस्थित समजले मला!!

कापर्या आवाजात मी म्हणालो "कधी साधारण ?"....

ते म्हणाले "लवकरच रे बाळा!!तिथी विचारू नकोस !!ती मात्र सांगणार नाही; तसेही तुला सांगणार नव्हतो ;आमच्या "ही"ला नाही माहित ;मुलाला;सुनेला आणि नातवाला देखील नाही माहीत..पण तुला सांगावेसे वाटले म्हणून सांगितले..हे ज्ञान तुझ्याजवळच ठेव..!!अभ्यास उत्तम कर..आणि चिंता करू नकोस..सत्य स्वीकारायला अवघड असले तरी ते स्वीकारल्यानंतरच ज्ञान प्राप्त होते..तुला समजेल म्हणून सांगितेले.!!"...

" अहो पण ,असे अचानक ?तुमची पत्रिका बघीतलीये मी; ईतका लगेच योग आहे वियोगाचा ते नाही समजले हो !!खरंच"..मी जड मनाने ,अस्वस्थ होत विचारले..

"अजून बरंच शिकायचंय बाळा तुला ज्योतिष !!..वेळ आहे ते सगळ समजायला ! आणि योग्य वेळी समजेल सुद्धा तुला..मी सांगतोय ते सत्य आहे इतके खरे ..एक गोष्ट ध्यानात ठेव,स्वार्थ हा खरा मृत्यू ;खरा नाश.. देहाचा अंत क्षणिक असतो,नियतीचा साधा नियम आहे तो ,त्याला घाबरून जाऊ नये.."..ते अगदी प्रेमळपणे म्हणाले .

"मी खरंच सांगतो ;काय बोलावे मला समजत नाहीये..पण मला अजिबात आवडलेले नाहीये हे तुमचे सत्य "...माझा कंठ भरून आला होता हे वाक्य बोलताना !!...शब्द सुचत नव्हते!!

माझा तळहात त्यांनी घट्ट धरला..माझ्या खांद्यावर थोपटले..आणि माझ्या खिन्न आणि विभ्रमीत झालेल्या मुद्रेकडे पाहून हलकेच हसले..त्या हसण्यात एक गांभीर्य होते;हळवेपणा होता...त्यांचे डोळे भरून आले होते...प्रेमाने आणि मायेने ..अगदी एखाद्या प्रेमळ आजोबांसारखे!!...मी न बोलता त्यांचा निरोप घेतला..!!

सहा महिन्यांनी त्यांचे निधन झाले..मला जावेसे वाटत असून मी गेलो नाही..पाय वळले नाहीत तिकडे !!..शैलेंद्र ने मध्यंतरी पुण्याच्या चित्पावन सभेचा अंक मला दाखवला..त्यात आजोबांची बातमी बघ
म्हणून सांगितले .मी वाचू लागलो ..
"चित्पावन ब्राह्मण समाजातील एक विद्वान ज्योतिषी श्री.अभ्यंकर यांचे आज निधन झाले..ते  सुपरिचित आणि विद्वान ज्योतिषी होते..परंतु प्रसिद्धीची कास धरली नाही...".ईत्यादी..आणि शेवटी वाक्य होते "...ब्राह्मणांमध्ये भूषणावह असलेल्या चित्पावन समाजात असे विद्वान निर्माण झाले हे या समाजाचे सुदैव ,..त्यांच्या मृत्यूने चित्पावन समाजाची मोठीच हानी झालेली आहे.." ..

मी शेवटच्या ओळीकडे विखारी नजरेने थंडपणे  निरखून पहिले  "... त्यांच्या मृत्यूने चित्पावन समाजाची मोठीच हानी झालेली आहे.."...हे वाक्य म्हणजे ह्या देवतुल्य माणसाची उंची शून्यवत करणारे वाक्य होते...!!..लोकांना थोर पुरुष समजत नाहीतच लवकर !!.मी पुन्हा वाक्य वाचले; माझा कप्पा उघडून मला हवी ती वस्तू मिळवली  एक जाड स्केच पेन !!
.............क्षणाचाही विचार न करता  मी ,त्या वाक्यातल्या  'चित्पावन' शब्दावर जाड स्केच पेनाने काळी गडद मोठ्ठी फुली मारली ...आणि तिथेच  त्याऐवजी  "समस्त ब्राह्मण"असे दोन  शब्द घालून तेच वाक्य पुन्हा वाचले ... "" त्यांच्या मृत्यूने 'समस्त ब्राह्मण 'समाजाची मोठीच हानी झालेली आहे.." आणी ,या वाक्यापुढे मनातच स्वताचे एक वाक्य टाकले ...."ही हानी किती भयंकर आहे हे;सध्याच्या विस्कळीत ;विभ्रमीत आणि स्वजातींचा अहंकार आणि उन्माद चढल्याने अज्ञानी झालेल्या संपूर्ण ब्राह्मण समाजाला इतक्या लवकर समजेल असेही वाटत नाही...!!"

........खरच सांगतो .....
""  असे "शुद्ध" आणि "खरे" ब्राह्मण अगदीच दुर्मिळ असतात;अगदी प्रत्यक्ष देवाच्या दर्शनाइतकेच .दुर्लभ!..  आणि मी त्यातल्या एकाचे अपरोक्ष  दर्शन घेतले हेच पुष्कळ आहे ..!!"" ...


.................................................लेखन:--- हर्षल

Friday, October 28, 2011

देशस्थ आणि कोकणस्थ..भाग १ [ मतभेद ]


प्रसंग १ :--[माझी मावशी माझ्याशी बोलतेय !! ]

"देशस्थ च बघ हं; हर्षु ;"

"का ग ?"

"अरे साध्या असतात ;सासर टिकवतात..शिवाय सरळ देवभोळ्या असतात बिचार्या !! "

"अग ;मावशी कुठल्या जगात आहेस ??";आजकाल असे काही दिसत नाहीये..."!!

"ते मला माहित नाही..;तू मुलगी बघशील तर आधी देशस्थ च !!...त्या  नंतर कोकणस्थ; ;आणि कऱ्हाडे आणि देवरूखे तर नकोच!! कळलं नं हर्षु ??"..



प्रसंग २:
स्थळ ;ब्राह्मण सभा 
[श्री .नेने मामा माझ्याशी  बोलतायत ..]

मामा:-"काय देशपांडे ;लग्न कधी करताय?

मी "अहो अजून m.tech  झाल्याशिवाय नाही..!!

अरे शिक्षण काय चालूच राहील..!!..लग्न वेळच्यावेळी झालेच पाहिजे हो..!!"

"अहो मामा ; तुम्ही आज ओळखताय का मला ?? ;मला माझे हातातले काम सोडून ईकडे तिकडे लक्ष द्यायला आवडत नाही... ..!!..लग्नाचं म्हणाल तर अजून वेळ आलेली नाहीये"

"अरे कसली वेळ आलेली नाही!!???..जास्त उशीर केलास तर नंतर डोक्याला हात लावून बसशील रे बाबा "


"अहो मामा;पण मला पसंत नको का मुलगी?.."


"अरे इकडे सभेच्या वधू-वर मंडळात ये ना कधीपण ;तुला दाखवतो हजार मुली..!!..हो पण माझा ऐकशील तर कोकणस्थ च कर रे बाबा;तुमच्या त्या देशस्थ मुली म्हणजे नुसत्या गबाळ्या रे;आमच्या मुली बघ कशा छान आणि धोरणी पणे संसार करतात ..कोकणस्थ कर;!!..तुला पेंडशांची प्रीती महितोये ना.!!आताच mba  केलंय!!,नाहीतर जोशांची ,ते जोशी नाहीत का,हार्मोनियम वाले;त्यांची मुग्धा ;डॉक्टर आहे लेका;आहेस कुठे?..विचारू का त्याना??..."


"अहो मामा ,त्या मुलींना आणि कमीत कमी माझ्या आई वडीलांना तरी विचारू कि नको??..हेहेहे!!.... ,तुम्ही तर मला चक्क लगेच बोहल्यावर चढवताय ,बर त्या मुलींना तरी देशस्थ चालेल का हे नको विचारायला ??,नाही ;म्हणजे अहो त्या असतील गोर्यापान ;नाजूक ..आणि आम्ही थालीपीठ कलर वाले ;उंच पुरे धिप्पाड ....अहो  मामा ,फोटो काढला तर black and  white वाटेल लोकांना...!!"


"अरे देशपांड्या;त्याची चिंता तुला नको रे;नेने मामांनी आजवर ५० लग्न जमव्लीयेत..!!..इंटर कास्ट !!..आहेस कुठे ?""


"इंटर कास्ट..??"


"अरे कोकणस्थ आणि देशस्थ लग्न म्हणजे इंटर-कास्टच ना.!!.हो कि नाही ??"


"अहो मामा,दोघेही; देशस्थ आणि कोकणस्थ हे ; ब्राह्मण असताना इंटर-कास्ट काय म्हणताय??....आपण सगळे एकच नाही का?..हा असला भेदभाव मला पसंत नाहीये..!!एखाद्या जातीचा स्वभाव ;काही गुण किंवा दोषांनी निर्माण झाला असेल तर त्यालाच चिकटून राहणे आणी स्वतःचे मूळ ईतिहास विसरून स्वताला जातीच्या पिंजर्यात स्वतःच्या तथाकथीत वैशीष्ट्यांसहीत बंद करून विनाकारण दुफळी माजवणे आणि भांडणे उत्पन्न करणे ह्या गोष्टींनीच आपण समस्त हिंदवी समाजाची खुलेआम कत्तल केलेली आहे..आणि जे मुळात नाहीत ते भेद निर्माण करून ठेवलेत..!!..........माझे मत तुम्हाला मी आधीसुद्धा सांगितले होते..आपण मागच्या वेळी बोललो होतो ,आठवतंय??..""


"अरे समाज सुधारका ,तू नसत्या उठाठेवी का करतोयस ?..ह्या नेने मामाचे ऐक ;छान कोकणस्थ मुलगी बघून लग्न करून टाक ;नसत्या विचारात असतोस रे देशपांडे तू.!!ऐक माझं!!."


"अहो ,कोकणस्थ किंवा देशस्थ हा वाद नको असे मला म्हणायचंय मामा !!..आणि लग्नाच म्हणाल तर साधी आणि सोज्ज्वळ ब्राह्मण मुलगी हवीये मला..जास्त अपेक्षा नाहीत!!..उगाच नखरेल आणि उर्मट नसली कि झालं..!!."


"तू काहीही म्हण ;पण लक्षात ठेव हो;कोकणस्थ मुलीच चांगल्या..!!..तुला ओळखतो चांगला म्हणून सांगतोय रे;आता आमची अर्धी लाकडं गेली मसणात ..ऐकलंस थोडं तर बिघडणार नाही !!"


"अहो मामा;इथे नं ऐकण्याचा प्रश्नच कुठेय??..मी म्हणतोय कि एकसंघ ब्राह्मण समाजात असे गलिच्छ आणि निष्कारण पेटवलेले भेदाभेद कशाला...??..मुलगी कुठलीही असू देत पण ब्राह्मण असली आणि शालीन असली म्हणजे झालं..!!.ब्राह्मण हा एक वर्ण आहे;आणि आम्ही त्याची जात बनवली ..आणि त्या नसलेल्या जातीच्या भिंती स्वताभोवती उभारून ;स्वताचे दोष आणि गुण जाती पोटजातींच्या नावावर खपवून त्याचे भांडवल करीत अजून बसलोय..!!ज्याची लाज वाटायला हवीये त्याचा अभिमान कसला धरतोय आपण??""


"अरे देशपांडे;तू कोकणस्थ मुलगी करणारेस कि नाही ते सांग..!!..उगीच बडबड करत बसू नकोस ;असे विद्वान खूप पाहिलेत मी..!!बरं,निघतोय मी आता;लग्न ठरवण्यापूर्वी नक्की भेट मला ..!!उगाच देशस्थ वगैरे मुली नको हो.!!चल येतो मी;मीटिंग आहे थोड्या वेळाने...अच्छा!! "..


..........मी नुसताच हात हलवून टाटा केला ..!!




प्रसंग ३.--
स्थळ :देशस्थ ब्राह्मण संघ कार्यालय
वेळ: दुपार ४ ची




[कार्यवाह श्री.कुलकर्णी आणि मी बोलतोय ]


"अरे देशपांडे ;ऐकून तर घेशील "


"त्याचा उपयोग नाही ;काका "


"अरे पण,सध्या लहान सभा आपल्यापुर्तीच ठेवली तर काय बिघडले??"


"मला ते जमणार नाही काका ;मी जे सांगितले त्यामागे फार व्यापक विचार होता..आणि तुम्ही सहमत सुद्धा होतात त्यावेळी..शिवाय जर चित्पावन सभेनी सांगितले कि जमणार नाही तर तो त्यांचा नाठाळपणा किंवा संकुचितपणा म्हणता येईल...परंतु अगोदर तुम्ही त्यांना कळवा तरी..!!..आपले पत्र पोहोचले का तिकडे ??..आपल्याकडून आमंत्रण गेले का त्यांना?.गेलेले तर दिसत नाहीये .!!.किमान सुरुवात तर करायला काय हरकत आहे?..कुणालातरी एक पाउल पुढे आणावेच लागेल..आणि आपण ती सुरुवात करायचीये ..!!माझा निर्णय मी बदलणार नाही..!!


"अरे हर्षल;इतके सोपे नाहीये ते ...तू म्हणतोस तसे देशस्थ आणि कोकणस्थ सभेचे एकत्र संमेलन घेणे..!!"


"अवघड काय आहे काका ,त्यात?,हे दोन समाज वेगवेगळे दिसत असले तरी ब्राह्मण सभेत सगळे एकत्र असतातच लग्न किंवा ईतर कार्यक्रमांसाठी ;तिथे लग्न -मुंजीचे  बुकिंग करताना स्वताला फक्त "ब्राह्मण" म्हणवतात ;देशस्थ किंवा कोकणस्थ असे समजत नाहीत ...वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना एकत्रच नकळत का होईना पण हजेरी लावतात ...!!तेंव्हा काही बिघडत नाही ;आणि मग आताच अगदी हा चित्पावन आणि हा देशस्थ वगैरे भेद कसले.??..आणि देशस्थानतर्फे आमंत्रण गेले तर येतील सुद्धा त्या संघातले काही लोक..!!..मी आधीच अनेक स्पष्टीकरणे देऊन तुम्हाला सांगितले होते कि यावेळी आपली वार्षिक सभा देशस्थ आणि कोकणस्थ अशी एकत्र होऊ द्यात..कोकणस्थ ब्राह्मण संघाला निमंत्रण पाठवा...भले त्यांना विचित्र वाटेल ..पण पाठवा..!!..मला एकत्र हवेत हे दोन्ही समाज आणि ईतर ब्राह्मण सुद्धा अर्थात ..!!.पण विशेष विनाकारण कटुता असलेले हे दोन समाज यंदा एका व्यासपीठावरून मला दिसायला हवेत !.."




"अरे बाबा ;पण सगळ्यांना ही कल्पना अव्यावहारिक वाटते ;ते जरा चेष्टाच करतायेत !..आणि शिवाय ईतके मोठे संमेलन manage कसे आणि कोण करणार;हा देखील प्रश्न आहेच.."


"काका;मला दहा दिवस सुद्धा लागणार नाहीत सगळे करायला मी करून देतो व्यवस्था !!..पण हे असे भित्रट उद्गार ;असे कूपमंडूक विचार ते कसे दूर करू मी?..ठरवलं तर वाट्टेल ते जमते ..!!पण माझ्याच माणसानमधला हा बोथटपणा आणि आत्मघातकी संकोच कसा घालवू हे मला समजत नाहीये..!!पाय मागे लावून पळणारे डरपोक मला सहन होत नाहीत .!मी मागल्या वेळी सगळे खुलासेवार सांगून देखील काहीही फरक पडत नाहीये हे बघून त्रास होतो..!!..मी वार्षिक सभेला येणार नाही..माझे पहिले वाहिले भाषण रद्द करून टाका..सूत्र संचालक होण्यात मला रस नाही.."


"अरे;एकदम टोकाला काय जातोयस तू?,मला सांग तुला भाषण करायला तरी काय हरकत आहे..चांगला बोलतोस तू..भारदस्त !!..म्हणून मुद्दाम दिलाय न तुला चान्स !!..तूच म्हणाला होतास ना तुला बोलायचय म्हणून!!.."


"हो मी म्हणालो होतो,पण कुठल्या कारणासाठी??..तर ब्राह्मण समाजातले वेगवेगळे प्रवाह जेंव्हा आपण वार्षिक सभेच्या निमित्ताने एकत्र आणू तेंव्हा त्यांसमोर मला अनेकानेक गोष्टी मुक्तपणे व्यक्त करायच्या होत्या ;त्यासाठी भाषण हवे होते मला !! पण आता एकत्र संमेलन होणार नसेल किंवा आपणच पावले पुढे टाकत नसू तर मला रस उरलेला नाही त्यात..जुन्या डबक्यात पोहण्याचा आता कंटाळा आलाय !!..आपलीच हानी आपणास दिसत नसेल तर काय उपयोग??..जाऊ द्यात !!..मी सभेला येणार नाही जर आधी ठरल्याप्रमाणे काही होत नसेल तर!!..पण तुम्हाला काही मदत लागली तर नक्की सांगा ..मदत वाट्टेल तेंव्हा करेन!!:




"अरे हर्षल ;ऐक ना ;आपण बघू रे तू एकदम काही ठरवू नकोस..!!


"काका ;बघू ;करू हे शब्द मला नकोत आता ...काही प्रत्यक्ष घडलं तर कळवा...!!..थोडं कमी अधिक बोललो असेन तर क्षमा करा पण मला ही कर्तव्यमूढता आता सहन होत नाही ...तुमच्यावर आणि आपल्या लोकांवर राग नाही माझा;पण महत्वाचे कार्य अडून राहिले कि मनस्ताप होतो ..म्हणून !!...ठीकाय निघतो मी..!!"

प्रसंग ४ :---

स्थळ :डोंबिवली 
वार्षिक वसंतोत्सव कार्यक्रम ..टिळकनगर विद्यामंदिर !!


प्रेक्षकांमध्ये मी बसलोय आणि ऐकतोय..
१] कोकणस्थ संवाद:-

"संदीप खरे मस्त आहे ना?.काय लिहितोय !!..शेवटी पुण्याचा चित्पावन हो आपला.काय वाहिनी?"
"हो न ;सलील सुद्धा छान गातो "
"एखादा अपवाद असतोच देशस्थांमध्ये तसाच सलील कुलकर्णी असेल"
"खरय ;सगळीकडे आपली मुले पुढे आहेत आजकाल "
"मग;आहोतच आपण तसे "


२]देशस्थ संवाद :-
"सलील कुलकर्णी .म्हणजे देशस्थ ;नाहीतर दुसरा कोण असणार?,..त्याच्यामुळेच खरी रंगत .गायनामुळे !!"
"अहो पण बाकीचे सगळे कार्यक्रमातले पाहिलेत का?..चित्पावन दिसतायेत ;आयोजकांपासून सगळे ..सगळीकडे पुढे पुढे असतात हे कोकणस्थ "
"खरय ,पण मेहनती देखील आहेत;चांगली कामे करतायेत "
"हो म्हणे चांगली !!;आप्ल्याईत्के हुशार नसून देखील फक्त पुढे पुढे करण्यामुळे चमकतात ;अन आपली पोरे मागेच !!"


मी माझी जागा बदलली ...तिकडे पुन्हा कान असेच काही ऐकू लागले ;मग मी रांग बदलून अगदी मागे जाऊन बसलो ..थोड्या वेळाने कार्यक्रम सुरु झाला ;गाणी वगैरे ऐकताना मघाशी "देशस्थ कि कोकणस्थ" ही  बडबड करणारे छान मान डुलवत गाणी ऐकत होते ..मी स्वताशीच हसलो...!!...देवाचे आभार मानले !!..म्हंटले या गाण्याने जसे यांचे उथळ बोलणे जसे तात्पुरते का होईना बंद पाडलेस तसे कायमचे हे द्वैत ;हे द्वेष मिटवण्यासाठी तुझे नाम गायन करण्याची बुद्धी दे रे देवा!!...कारण देशस्थ कि कोकणस्थ या वादात आता विनोद शोधायचे दिवस गेलेत..सगळे ब्राह्मण एकसंघ  कर रे देवा!!............
...................................लेखन:-हर्षल

Wednesday, October 26, 2011

................................!!गौतम बुद्धांचे मनोगत !!.........................



मी दिले सोडूनी पार देह भोगांना  ;
अन सवे घेतले दुखांच्या कळपांना..
उद्रेक घेतले संगे उग्र हताश  ;
ते क्षुद्र तोडले संसाराचे पाश ..!!


आसक्त सोडली विकारधारी माया ..
अनुरक्त जाहलो दुखःमुळाच्या पाया ..
ते तमात बुडते मानव पाहत गेलो;
अन निर्वाणाचे रस्ते शोधत गेलो..!!

राज्य सोडले, दिली सोडूनी कांता,
ही घोर लागता विश्व-जनांची चिंता ,
प्रेमाचे हृदयी भरून सागर फिरलो;
दुखात पोळले जीव शांतवत गेलो..!!...


संग्राम पाहिले अशांत धरणीवरती  ..
अज्ञान वाहुनी समस्त मानव जगती ..
मी शोधत दैवी प्रज्ञा म्हणुनी गेलो;
अन सत्य सुमंगल हृदयी तेवत गेलो..!!

पौर्णिमेस दिसला प्रकाश शुद्ध विरागी ..
अश्वत्थाखाली प्रज्ञा झाली जागी ..
म्हणतात कुणी मज बुद्ध कुणी बैरागी..!!
मी स्वतास म्हणतो केवळ मानवयोगी..!!

......................लेखन - हर्षल..!!

Tuesday, October 25, 2011

........................"त्या" तीन मुली..................!

""ईईईईई.....ते काय होतं ग?? "...!

"ईईई..अग काळपट जनावर होतं वाटत..पटकन क्रॉस झालं न म्हणून दिसलं नसेल..!!:"

"तुम्हा दोघींचे डोळे बिघडलेत का?..हेहेहेहे..अग तो मुलगा होता..पण खूपच काळा ;गबाळा  आणि गलिच्छ ..पण प्राणी नव्हता ..माणूसच होता.हेहेहेहे..अग;मी म्हणते पण काय ग;ही काही तरुण मुले जनावरांसारखी काय राहतात ग?..शी.!!.मला बाई किळसच वाटली..  !!

"कसला घाणेरडा मुलगा होता ग तो.?.!!रूप नाही ,रंग नाही..रेडा कुठचा..!!..अग मला खरच प्राणी वाटला तो..!!रिअली ..आय स्वेअर !!"

"जाऊ देत ;ए चल;ती बघ बस आलीच!.जाउयात लवकर !.खूप शॉपिंग राहिलंय!!.मग नंतर उशीर झाला कि परत आहेच!!..जनावरांकडे कुठे बघताय??हेहेहे..मस्त handsome कोणी बघुयात.!!काय ग आशु??..हेहेहे...!! ..ए चला ग ..चढा लवकर बसमध्ये !!"



..................... मुंबई cst बाहेर  एका बस-stop वर मी बसच्या रांगेत उभा असताना ..दुपारी जरा कमी गर्दीच्या वेळी  घडलेला हा प्रसंग...तीन यौवन-संपन्न सुकन्या [[.आता त्या 'सुकन्या' होत्या कि चावट कन्या होत्या ते मज पामरास कसे कळणार..??]]....नुकत्याच एका रस्ता धावत पार केलेल्या तरुणाबद्दल आपली महान मते मांडत असताना मी ऐकत होतो..मी काही त्या मुलाला पहिले नसल्याने खरोखरच तो जनावर किंवा भयानक होता कि नाही ते मला ठाऊक नाही..परंतु कुठलाही तरुण ""ईईई ;ते काय होतं ग? ""..अशा तृतीय पुरुषी नपुसकलिंगी उल्लेखाने वर्णन करावा इतका काही वाईट नक्कीच असणार नाही..अगदी केनियातला ओडुम्बे वैगरे नावे असणारा कळकट्ट शिरोमणी तरुण सुद्धा ..!!..पण ह्या फाजील सुकन्यांना तो मुलगा आहे हे उशीरा कळले..आणि तोवर त्या त्याला चक्क प्राणी समजल्या..!!


.........मला तर वाट्त ;मुलींची बोलायची style च जरा वेगळी असते..हत्तीचे कसे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात तशी...!!..नुस्त एव्हढंच नाही,तर मुली जरा समजायला अवघडच असतात ..विशेषतः १६ ते २७ मधल्या मुली.!!.एकंदरच आजकालच्या मुलींवर तर असे झपाट्याने हे नवीन बदलाचं वारं स्वार झालंय;कि काही विचारता सोय नाहीये.!!...[[..मुलगे तर already चावट असतातच..तेंव्हा त्यांची बाजू मी घेत नाहीये;पण आता आजकाल ""..सुंदरा ;शालिना,सुसंवादिनी .कोमला ,मोहिनी ,सलज्जा ""....वैगरे वगैरे विशेषणांनी आजवर समजल्या जाणाऱ्या तरुण मुली सुद्धा चावट  पणाला सहज "used to " झाल्यात इतकेच नव्हे तर चार पावले पुढेच गेल्यात असेच चित्र दिसतेय!!..असो ..]]


.....तर ;मी ह्या सुकुमारीन्च्या थोडा मागेच रांगेत उभा असल्याने व गर्दी अगदीच नसल्याने ..त्यांचे सुसंवाद कानावर पडून धन्य होत; त्यांच्या अप्रतिम मराठीला आणि अभिजात बडबडीला मनापासून नमस्कार करत बसमध्ये चढलो..[[त्या आत गेल्यानंतर !!]]....बसमध्ये चढल्यावर त्या तिघी गोंडस बालिका "महिलांसाठी राखीव" अशा जागेवर बसलेल्या एका मध्यमवयीन काका काकुंना गोड बोलून पटवत होत्या ....[[[..काका ;प्लीज..आम्हाला बसू द्याल का ..दमलोय खूप ईत्यादी... ओह!!.thank  you काका!!तुम्हाला लगेच उतरायचंय ना!!..आंम्ही धरतो न काकूंची bag ..सो स्वीट ऑफ यु काकू !!..ईत्यादी ईत्यादी .]]]..आणि चक्क काही मिनिटातच जागा मिळवून त्यांचे त्रिकूट खिदळत स्थानापन्न झाले देखील..!! ते काका-काकू तर धन्य झाले असावेत...ह्या अशा temporary "पुतण्या"..मिळाल्यावर ! [ मस्त बनवला काकाला--मी मनात म्हंटले..!! ]]
.......मला मुलींच्या ह्या "पटवा-पटवी" कौशल्याचा हेवा वाटत आलाय!!....एकंदरच मुलींचे स्वभाव; अखंड आणि अफाट बडबड आणि त्यांची चलाखी वर्णनातीत आहे हे स्वतः ब्रह्मदेव सुद्धा मान्य करेल...बरं ब्रह्मदेवाने गुपचूप  मान्य केलं तर ठीक आहे नाहीतर खुद्द ब्रह्मदेवालाच  मुली म्हणतील.." काय हे.? दाढीवाले आजोबा.??..आमच नाय ऐकणार?.असे कसे हो तुम्मी ??.प्लीज. प्लीज .प्लीज !!.म्हणा ना आम्ही हुशार आहोत!असं काय करताय ??.दाढीवाले आजोबा??...""....आणि यापुढे तास दोन तास, त्या देवाला सविस्तरपणे { आणि sincere पणे(  म्हणजे अत्यंत  रटाळ पणे )} समजावतील कि त्या कशा हुशार आहेत.. !!


......आणि मग [..त्या तुफानी बडबडीला कंटाळून  ] ब्रह्मदेव पण मान्य करेल कि, खरच ;आहात हां मुलींनो तुम्ही हुश्शार !!आणि म्हणेल "".कृपा करून आता निघा हं लाडक्या (कि बडबड्या ?) बालिकांनो! ;माझी चारही डोकी दुखायला लागलीयेत..बाय.. बाय.. टाटा!!..आणि परत येऊ नका हा माझ्याकडे..!!..जा ग जा .! हुशार कुमारीकांनो खाली पृथ्वीवर जाऊन तुम्हाला जो गोंधळ घालायचाय तो सुखाने घाला!.तुमच्या हौशी पुरवणारे आणि तुम्हाला बघून घायाळ वगैरे होणारे  मद्दड नरपुंगव [ उर्फ= पुरुषरूपी बैल ] आम्ही निर्माण करून ठेवलेलेच आहेत..जा,त्यांना आकर्षित करा आणि मग लग्न वगैरे करून "दे माय ,धरणी ठाय "अशी अवस्था करून सोडा..त्याशिवाय लेकाचे भक्ती करणार नाहीत देवाची..दुखातूनच भक्तीचे कमळ उगवते...ते कमळ त्यांच्या मनात उगवून देण्याचे काम तुमचे..जा पोरींनो जा...i am with you ,एन्जोय!! but  leave  me  alone ..प्लीज  !! ""..असो ..


.............तर सांगायचा मुद्दा हा कि ;त्या तिघी सीटवर बसल्या आणि काही वेळाने भाग्यवान अशा मला त्यांच्या मागेच महिलांसाठी नसलेल्या अशा सीटवर जागा मिळाली ..[ एक अवाढव्य दिलदार सिंधी मनुष्य.."ईधर बैठो जी ;असे मला म्हणत उठला तेंव्हा जागा मिळाली !! ..तो मुलींच्या बडबडीने तर नाही न सटकला??..जाऊ देत.. आपल्याला काय ? त्या इंटरेस्टिंग पोरींच्या मागे सीट मिळाली ना !!मग झालं..!!]


.......आता मला एक छान संधी मिळाली..मला त्यांना न्याहाळायचे वगैरे होते असे नाही..पण मला त्यांना ऐकायचे होते.!!..मी मवाली किंवा टारगट मुलगा नसल्याने केवळ मुलींना नुस्त बघूनच पिसाळणे
किंवा अश्लील वर्तन करणे मला आवडत नाही...सौंदर्याचा अपमान गलिच्छ पणे करणे मला सहन होत नाही .....पण चौकस पणाचा शाप [कि वरदान??] मला असल्याने आणि इथे तो चौकस पणा नको तितका  जागृत झाल्याने मला उत्तम संधी मिळाली असेच (मज निष्पाप!) मानवास वाटले तर त्यात नवल ते काय..!!..


...............असो..तर एकूणच त्या तिघी हसत होत्या;बोलत होत्या [खिदळणे;बडबड करणे हे शब्द जास्त सूट होतील!!]...आणि माझे कान धन्य होत होते..त्या तिघी एकमेकींना लाडाने shortform  वापरून हाक मारायच्या...*...तिघीमध्ये एक "आशु"..होती; एक "रुपी"होती आणि उरलेली सुडौल तरुणी म्हणजे "मनु"..!!.वा रे वा "आशु" ,"मनु" आणि "रुपी" .[[तीन सुंदर बडबड्या देवी...!!]]


.......ह्यांची मूळ नावे काय असावीत तो विचार मी केला पण ती कळून सुद्धा काय फायदा..??..कारण माझे कान त्यांचे सुखसंवाद ऐकत होते...मनुने आपल्या अजस्त्र पर्स मधून [[ त्या तिच्या हातातल्या वस्तूला पर्स म्हणणे म्हणजे गोणपाटाला दुधाची पिशवी म्हणणे होय..ही पर्स प्रचंड design असलेली आणि पूर्ण वाढलेला अख्खा कांगारू शेपटी सकट आत मावेल इतकी मोठ्ठी होती..]]..वेफर काढले..!! "आशु "ने  आधीच केक फस्त केलेला होतं आणि "रूपी" कुठलेसे जाड ईंग्लीश नॉव्हेल तिच्या मध्यम आकाराच्या पर्स वर ठेवून बसली होती..!!.."मनु"ने सगळ्यांना वेफर वाटले..आणि दोन तीन तोंडात टाकून परत बोलायला सुरुवात केली..नुकताच केक संपवलेली आशु;वेफरची
चव घेत गप्पा मारू लागली................!!...............


.....तिघींचे मोबाईल सतत हातात खेळत होते..आणि headfone च्या बारीक वायरी इकडे तिकडे झाडावरच्या वेलीसारख्या  रुळत होत्या..एकीकडे एका कानात वाजणारी गाणी ;एकीकडे हातात वेफर ;पाण्याची बाटली ;नाजुकसे हातरुमाल ;एकीकडे गप्पा अशा तीन चार आघाड्यांवर ह्या तरुणी एकदम लढत होत्या,.आणि सर्वत्र यशस्वी ;विजयी होताना दिसत होत्या....[[..बडबड करण्याची olympic स्पर्धा असेल तर एक पण मुलगा काठावर पण जिंकणार नाही...:!!]]


.......सुरुवातीला त्या शोपिंगबद्दल बोलल्या..कुठले दुकान किती चांगले ..आपले बजेट किती;कुठल्या दुकानात जाऊ नये;दुकानदार कसे बनेल असतात ;mall चांगला कि shop ..असे अनेक विषय लीलया हाताळून..मग त्यांची गाडी रूळ बदलून घरगुती चौकशांवर आली..आशु चा भाऊ कसा आजारी आहे..आणि तिच्या मित्राने कशी तिला हेल्प केली हे मला कळले.!!"मनु"चे पप्पा किती कडक आहेत आणि ती तिच्या "पप्पांवर" कशी गेलीये; ह्याचे अमुल्य ज्ञान प्राप्त झाले.;"रूपी"ला घरात फक्त तिचा डॉगी आणि टेडी [[हे तिचे अनुक्रमे कुत्रा व lovebird आहेत ]हेच कसे नीट समजून घेतात ;आणि आई वडील कसे घेत नाहीत हे समजले..!!(..हिला आई बाप समजून घेत नाहीत ??मग मोबाईल काय कुत्र्यानी sorry डॉग्गी नी घेतला असेल..??...मी मनात म्हंटले..!!)


.......या चर्चेनंतर जरा वेळ उदास चेहरे होऊन पुन्हा अल्पशी विश्रांती घेत पुन्हा "मनु"च्या अजस्त्र पर्स [[जादूची पोतडी ??]] मधून मसाला दाणे आणि cadburry  बाहेर आली..!!आशुने एवढ्यात तिच्या लहान दिसणार्या {{..आतून कुठलीही लेडीज पर्स लहान नसते..असा सिद्द्धांत लक्षात ठेवा ..त्यात दुनिया भरलेली असते ..जो मंगता है सब मिलेगा!!..साक्षात अलिबाबा सुद्धा हरवेल अशी गुहा असते  ती !! ..}} पर्स मधून लिपस्टिक आणि छोटासा आरसा काढून रंग-रंगोटी करून घेतली..केसांचा मागे बांधलेला band  का काय असतो तो दोनदा काढून परत लावला ..आणि विनाकारण मानेला झटके देत cadburry कडे मोर्चा वळवून मसाला दाणे जवळपास संपवलेल्या "मनु"कडे बघत उसासे टाकत cadburry चे दोन तुकडे तोंडात टाकले.!!..."रूपी " मात्र  वेफर आणि मसाला दाणे एका हातात घेऊन ;दुसर्या हाताने पुस्तक; mobile  ;रुमाल..सांभाळत ".अग ए ; आता cadburry कुठे ठेवू  ग मने??"..असे फारच अवघड आणि मूलभूत प्रश्न विचारत होती..{.केव्हढा त्रास तिच्या चिमुकल्या मेंदूला होत असेल ??..नाही का??..}!!........................काही वेळानंतर cadburry ,वेफर,मसाला दाणे आणि थंड  पाण्याच्या दोन बाटल्या;'रुपी'च्या हातातले पुस्तक  हे सगळे अदृश्य झाले.[म्हणजे संपवले किंवा पर्स मध्ये गेले !!..].आणि तिघी पुन्हा फ्रेश होऊन बोलू लागल्या.......


.................या वेळी बोलण्याचा विषय होता मुले..!!..म्हणजे boyfreinds !!.माझे कान टवकारले...!!


...............रुपीच्या मते मुलगा गोरा ;धीट dashing आणि caring  हवा..!."मनु"च्या मते रंग कसा पण असू देत पण स्वीट हवा.{..स्वीट आणि dashing हे मला न कळलेले शब्द आहेत ;म्हणजे त्याचा अर्थ कसा घ्यायचा हे मला मुळीच कळत नाही..}}.!."आशु"ला बहुदा आधीच थोडा अनुभव असावा म्हणून तिने मुलगा मस्त असावा ईतकेच सांगितले..आता मस्त म्हणजे "मदमस्त "कि नुसताच मस्त हे काही मला आणि उरलेल्या दोघींना कळले नाही.!!...बहुदा 'आशू'च्या मते ,आपल्याला आवडणारा मुलगाच आपल्यासाठी  मस्त  असणार असे काही तरी तिचे  गणित असावे!!....'मुले किती मक्ख असतात इथपासून; मुलांमध्ये काय पहावे आणि काय पाहू नये येथपर्यंत ..शिवाय मुलांना कसलीच अक्कल कशी नसते ..आणि त्यांचा आगाउपणा कसा चालू असतो येथपर्यंत ;शिवाय आपल्याला पहिल्यांदा कोण आणि कसा मुलगा आवडला होता ..पहिला crush कसा होता येथपासून ते नन्तर अनेक crush कसे झाले येथपर्यंत ..सगळे काही ५ -७ मिनिटात त्या त्रिकुटाने बोलून घेतले.!!..काही आचरट शब्द त्यांच्या तोंडून ऐकताना तर माझे गळ्यातले जानवे आणि त्यातला धर्म आता बुडणार कि काय?  ;किंवा माझ्या डोक्यावरची नसलेली शेंडी ;जर असती तर antenaa सारखी ताठ झाली असती काय ?;हे प्रश्न मनाला सतावून गेले..!! मी मान्य करतो कि खरच , काही काही शब्द [अपशब्द] मुलींनी वापरू नयेत ह्यावर माझी दृढ श्रद्धा आहे.!!.म्हणजे तेच अपशब्द मी हजारदा ऐकेन पण गोंडस मुलींच्या तोंडून नाही..फारच वाईट दिसते ते...अगदीच अशोभनीय !!   शिव्या देणार्या मुली शोभून दिसत नाहीत ..मला कसेसेच होते,..म्हणजे उत्तम दर्जाच्या शिव्या मला ठाऊक नाहीत असे नाही [मी देत नसलो तरी ..]!!..पण मुलींनी तेच शब्द उच्चारले कि ..प्रत्यक्ष "लता"ने अलिशा चिनॉय  [[  आलीशा =  ""कजरारे कजरारे  काले काले नैना""हे गाणे भयाण आवाजात म्हणणारी !!]]  ची गाणी म्हंटल्यावर जसे वाटेल तसे वाटते ..!! काही गोष्टी गोंडस व चांगल्या मुलींनी करू नयेत या मताचा मी आहे..कमी कपडे घालणे;शिव्या देणे;ड्रिंक [म्हणजे दारू हो..!!]किंवा स्मोक करणे;स्वताच्या प्रेमाचा बाजार मांडणे ;अश्लील बोलणे ;मुलांसारखे वागणे...अशी मोठ्ठी यादी करता येईल...पण आत्ता नको.!!...........तर आपण पुन्हा या तीन तुफान बडबड करणार्या ..{{आणि बोलून बोलून सफरचंदासारख्या लाल गाल झालेल्या ..}} पोरींकडे  वळूयात..!!
.....................मुलांवरून आता विषय परत शोप्पिंग वर गेला..{{...मुलींना हेच दोन विषय आवडतात वाट्त..शोप्पिंग नाहीतर मुले !!?? }}..मेक अप पासून ड्रेस पर्यंत सगळी उजळणी झाली.!!..कुठल्याही विधानाला खिदळणे किंवा उगीच विरोध नोंदवणे चालूच होते तिघींचे..तरी शेवटी एकमत होऊन शोप्पिंगचा विषय संपला..आणि तितक्यात एक goggle घातलेला ;तिशीचा देखणा मनुष्य बसमध्ये चढला..काही पुरुषांना देखणेपणा मानवतो...[[..आम्हाला देखणेपणा म्हणजे काय हे अद्याप माहित नाही.!!.मी आरशासमोर उभा राहतो तेंव्हा काही वेळाने आरसा वैतागून स्वताच फुटेल किंवा माझे प्रतिबिंब दाखवल्याबद्दल मेहेनताना म्हणून पैसे मागेल अशी भीती वाटते !!]]..तर हा तरुण उत्तम कपडे घातलेला ;goggle आणि उत्तम महागडे घड्याळ घातलेला ;आणि राजबिंडा असा दिसणारा;  आत आला आणि मला एकदम न्यूनगंड का काय तो वाटला..!!आपण असे दिसू का कधी असा विचार मनात ठेवत मी जरा मान खिडकीकडे वळवली..मनात आलेच तरीही " साला;आता हा हिरो बघून ह्या पोरी पाघळणार...तात्पुरते का होईना.पण नक्कीच..!!...आणि अंदाज खरा ठरला...तिघींनी त्याला पहिलेच..!!..नवलाचे ;आश्चर्याचे; सुस्कारे सोडलेच..!! आणि तिघी हळू आवाजात एकमेकींना डोळे मिचकावत बोलू लागल्या..अगदी हळू..पण माझे कान महा तिखट असल्याने ते संवाद पुष्प सादर करतो...........
[ सूचना:-- खालील संवाद अगदी हळू आणि कुजबुजत्या स्वरात झालेला आहे...शिवाय जन-लज्जेपोटी आणि वाचकांच्या निष्पाप मनांवर चावटपणाची सावली पडू नये यासाठी ; ह्या सुंदर युवतींचे काही शब्द "कट"करून किंवा काही "चावट पणाच्या"सीमा ओलांडलेली त्यांची वाक्ये गाळून खालील संवाद सादर केला आहे...वाचकांनो ह्या "सेन्सोरशिप" बद्दल मला क्षमा करा!..नाईलाज होता !!..}}




आशु:-"ए बघितलास का ग"?..personality बघ ना..!!
मनु:-"खरच..handsome !!..मस्त आहे ग."! 
रुपी:-श्रीमंत पण दिसतोय..ray -ban घातलाय..कसला सूट होतोय न फेस ला!!
मनु:-"ए पंजाबी असेल का ग ??कि दिल्लीचा ? "..
आशु:-"कसला स्लीक आणि chubby आहे ग..!!" 
मनु;-"आणि highly educated पण..वाटतोय !!"
रुपी:-"smart पण आहे ;मिशी मस्त वाटते त्याला ..हॉट लुक्स..!! "
मनु:-"पंजाबीच बहुदा ,..आपल्यात ईतका छान कोणी असतो का?..हेहेहेः "
आशु:-"muscular  पण आहे..एकदम macho ..!!
रुपी:-"काय ग;आशु ?..फिदा झालीस कि काय ..?"
आशु:-चल ग.!!.पण खरच handsome आहे.!!  I wish असा कोणी भेटेल..!!perfect !!"
मनु:- "ए;पर्फेक्ट्वाली ;पुढचा stop आपला आहे..तो handsome काय कडेवर घेऊन नाही सोडणारे  ......तुला!!..हेहेहेहेः..चला आवरा आता !!""        
रुपी:-"ए मने,मोठा शहाणपणा करतीयेस ,पहिल्यांदा तूच टक लावून बघत होतीस ना..!!i  know  .....you well मने..!!"  
आशु:-"हो ना !!ही मनु म्हणजे "मी नाही त्यातली" type असल्याचा आव आणते आणि सगळं बरोब्बर ......हळूच बघून घेत असते..मांजर आहे मांजर ..!!ए पण काही असू देत हां;बस मध्ये आल्याचा एक ......फायदा तरी झाला .!..जाता जाता का होईना डोळ्याला मजा आली..कसला sincere वाटतोय ग ......तो..त्याची बायको कसली लकी असेल ग..!!"..नाहीतर मघाशी stop वरून दिसलेला तो .....मुलगा!!..मला वाटला प्राणीच आहे तो..हेहेहेहे.!!..see  the  difference !!!...
मनु:--"कळलं हो ..चला उतरायची वेळ झाली.."!!
आशु:--"ए त्या हीरोला टाटा करूयात का..??हिहीः"
रुपी:--[अगदी हळू आवाजात ]"बाय बाय सोनू;असाच भेटत रहा "!!
आशु:--ए अग काय हे..??.हेहेहेः.[अगदी हळू आवाजात ]. anyways बाय handsome "!!

............................................बस थांबली ..तिघी उतरल्या..मी घाम पुसला!! खतरनाक कार्ट्या होत्या !!..त्या माणसाला माहित पण नसेल तीन पोरींना त्याने मजा वगैरे दिली होती !! त्या तिघींचे शब्द कानात प्राण आणून ऐकणारा मीच असल्याने बसमधल्या ईतरांना अर्थातच काही कळले नव्हते!! ..मी खिडकीतून पाहिले..खाली रस्त्यावर त्रिकूट परत काहीतरी बडबड करण्यात गुंतले होते!!..बस शेवटच्या मुक्कामाकडे निघाली ;तिघी डोळ्यासमोरून दूर झाल्या..बरेच काही ऐकवून आणि समजावून..त्यांच्याही नकळत..!!त्या कोण होत्या हे मला आज सुद्धा माहित नाही..त्या कधी भेटतील असेही वाटत नाही..त्यांबद्दल आकर्षण तेंव्हाही नव्हते आजही नाही..परंतु एक नवीन जाणीव त्या तीघीनबद्दलची मनात उगाच आहे.!!..मुलींचे मन कसे असते हे मुलींनाच कळत नसल्याने ईतरांना कळू शकत नसावे असे मात्र नक्की वाटते...!..त्या तिघी अशाच काही शिकवून गेल्या;थोडे हादरवून गेल्या;थोडा आनंद देऊन गेल्या ..मुलींबद्दल ;स्वभावाबद्दल एक प्रातिनिधिक ज्ञान देऊन गेल्या ..ईतके मात्र नक्की..!!..
............बाकी सब छोड दो !! पण त्या दिवसापासून , एक तरी मी नक्कीच शिकलो !!!.मी लगेच ,दुसर्या दिवशी स्वच्छ दाढी केली;मिशा कोरल्या..अंघोळ करून ईस्त्रीचे कपडे घालून ;बुटांना polish करून मगच घराबाहेर पडलो..!!..कारण आज पण मला त्याच बसने ;त्याच stop वरून जायचे होते..!!..कोणी जाणावे;कदाचित त्याच तिघी तिथे उभ्या असतील तर ?...आणि समजा मी नेहेमीसारखा ;म्हणजे सर्वसामान्य कपड्यांत आणि दाढी वगैरे न करता [बोकडासारखा]..जसा असतो तसा पटकन त्यांच्या  समोरून गेलो तर??..त्यांनी मला तशा स्थितीत पाहिले तर??...विचारानेच घाम फुटला मला !!.....मला चांगलीच कल्पना आहे त्या काय म्हणतील ,........तुम्हालाही असेल..!.
!!............................सांगू????.........

त्या म्हणतील किंवा त्यातली "आशु" तरी नक्की  म्हणेल..;
........."" ईईईईई ;ते बघ काय??  जंगली प्राणी!! खूपच भयंकर आहे ग!!;ए मने;तो रानडुक्कर आहे कि रानरेडा किंवा बैल आहे ग ?? ..पण मग जनावर असेल तर त्याने  कपडे का घातलेत ग ??...मला परत भास होतोय का ;हा माणूस असण्याची काही शक्यता आहे का ग ;कालच्यासारखा ??""..


आणि दुसरी कोणी म्हणेल  [माझ्या दुर्दैवानी !!]--
..""अग आशु ;कालचा तो कळकट्ट प्राणी म्हणजे  माणूसच होता ग..पण आज मात्र खरच जंगली प्राणी दिसतोय!!..पण रानडुक्कर नाही वाटत;"रानरेडा" कदाचित असू शकेल; पण ;आय थिंक.;बहुतेक "झूल घातलेला" "सजवलेला "बैल असेल ग.. !!..अग "पोळ्या"साठी सजवला असेल ;पण मला एक कळत नाही कि, अशा  मोकाट जंगली प्राण्यांना  रस्त्यावर मुनिसिपालटीचे लोक फीरुच कसे देतात??..चांगला फटकावून पिंजर्यात कोंबा ना अशा मट्ठ बैलांना.किंवा रेडयांना..!!.हो कि नाई ग??!!   "" .......................


.........खरं सांगतो लोकहो ;मला त्या तिघींनी 'असे' काही म्हणावे अशी माझी अजिबात ..म्हणजे अजिबात ईच्छा नाहीये...(माणसाला प्राणी म्हणतात तो पण जंगली ??)..!!....त्या दिवसापासून कधीही मुंबईला जातांना मी अत्यंत स्वच्छ कपडे घालून चांगल्या अवतारात जातो; त्याला त्या तीन महामाया कारणीभूत आहेत......!!!.


.........................लेखन ------हर्षल..!! 

Sunday, October 23, 2011

.!!........ज्योतीषम मूर्धनी स्थितम.!!

मित्र:-:"तुझी रास काय आहे ?नाही;लोकांच भविष्य सांगतोस म्हणून म्हंटल !!"

मी:- "मिथुन "

मित्र :-::"काय म्हणतोस;मिथुन?मला वाटायचं मेष !!चायला मिथुन ??..मग तू पण असाच  ईथून -तिथून ..मिथुन..हेहेहे.."

मी:-"अरे ;पण माझे पुनर्वसू नक्षत्र आहे..तृतीय चरण !!..आर्द्रा नाही!!..तू म्हणतोस ते गुण मिथुनेमध्ये आर्द्रा नक्षत्राचे आहेत .. आर्द्रा नक्षत्र बुधाचे असते आणि म्हणून जरा उथळ बुद्धी येते, पण पुनर्वसू गुरुचे नक्षत्र आहे..म्हणून स्वभाव वेगळा असतो;तत्त्वचिंतक आणि प्रेमळ आणि कर्तव्यकठोर ईत्यादी ..!! एका राशीत वेगवेगळी नक्षत्रे असतात..३० अंश आणि सव्वा दोन नक्षत्रे..नक्षत्र फळ महत्वाचे..किंबहुना तेच मूलभूत आहे ..नक्षत्र फळ.!!..माझा स्वभाव पुनर्वसू नक्षत्राच्या प्रमाणे असणार ..कुठल्याही पुस्तकात पुनर्वसू नक्षत्राचे फळ वाच  !!"

मित्र:-"असेल तसे सुद्धा ;पण अरे;मी प्रोग्राम पाहिलाय;मिथुन रास म्हणजे माकडांची रास...म्हणजे पोकळ विनोदी सगळे मिथुन-राशीवाले  ..ज्ञानाची खोली नाही . !!"

मी:-"म्हणून ;अर्धवट माहिती कानावर पडू नये असे मी नेहेमी म्हणतो न ते याच साठी..!!काहीतरी पूर्वग्रह निर्माण होतात आणि ज्ञान राहते बाजूलाच.!!   तुझ्या माहितीसाठी सांगतो;समर्थ रामदास स्वामी आणि आद्य शंकराचार्य दोघांचे नक्षत्र पुनर्वसू होते;अर्थातच रास मिथुन होती..माझे आहे तेच नक्षत्र आणि तीच रास,,!!"

मित्र:-"बर ;बरं,ज्योतिष विद्या विशारद ;कळले ;कळले!!लगेच    लेक्चर नकोय प्रोफेसर !!.तू पण बघतोस न रे पत्रिका??"

मी:-"तुला माहितीये ना..!.तरीही उगाच ??"

मित्र:-"अरे;कधीतरी गम्मत करतो रे तुझी;अरे पण ताईची पत्रिका सांगितलीस तोपर्यंत मला पण माहित नव्हतं यार.!!..तू कोणाला सांगितलं का नाहीस?..आजकाल ज्योतिषी जाम कमावतात ;तुला चान्स आहे..गम्मत करतोय हं..नाहीतर पुन्हा भडकशील..!!.


मी:--  "...अरे;आपल्याला ज्यातले कळते त्यावरच विनोद करावेत बंधू!!

..आजकाल काही लोक किंवा काही अडाणी लोक म्हणूयात ज्योतिषाच्या नावावर कमावतात हे 

खरय!!..पण ते किती सत्य-निष्ठ आणि उत्तम ज्योतिषी असतात ते मला माहितीये..!!

अर्थात अगदी काही अपवाद वगळता बहुतेक ज्योतिषी म्हणवणारे लोक अगदीच सामान्य वकूबाचे आणि 

अत्यल्प ज्ञान असणारे ;किंवा क्वचित थापा मारणारे सुद्धा असतात ..!!..ते लोक जे सांगतात त्याला 

ज्योतिष शास्त्र असे न म्हणता जन्म-पत्रिकांचे अतिसामान्य समीक्षण ईतकेच म्हणता येईल .!!

ज्योतिष-शास्त्राचे ध्येय आणि गांभीर्य ;या शास्त्राची संपन्नता आणि या शास्त्राचे आत्म-रहस्य समजणे म्हणजे पोरखेळ नाही..!!..

ज्योतिष हे शास्त्र आहे..धंदा नव्हे..आणि पैसे घ्यायचा अधिकार अत्यंत विद्वान आणि शुद्ध ज्ञान असलेल्या ज्योतीषांनाच आहे...ज्योतिष हा धंदा झालाय तो अज्ञानी लोकांमुळे..खरा ज्योतिषी स्वयंसिद्ध 

असतो..आश्रित नव्हे..!!हे काळाचे आणि परमेश्वराचे असे ज्ञान आहे ज्याची सुरुवात 

शास्त्र आणि गणित शिकण्यातून होते..आणि पुढे त्याचे मार्ग प्रज्ञेच्या 

आणि अन्तःस्फूर्तीच्या क्षेत्रांतून जातात...आणि  हा पुढचा मार्ग 

अत्यंत दुष्कर आणि केवळ भाग्यानेच प्राप्त होणारा आहे...गणित 

समजले ;दोन चार नियम समजले तर ज्योतिष समजले असे म्हणणे 

म्हणजे थेंब भर पाणी हातात घेऊन समुद्र ओंजळीत घेतलाय असे 

म्हणण्यासारखे आहे...ज्योतिष म्हणजे नुसते माणसाचे भूत भविष्य 

ज्ञान नाही.!!.हा विषय अत्यंत विशाल आहे..किंबहुना धर्म 

जाणणार्या आणि आत्मबुद्धी असणार्या माणसांनाच यात मुक्त संचार 

वेदांनी ठेवलेला आहे....सर्वांसाठी नाही...असेच लोक जे ईश्वर आणि 

विज्ञान जाणतात तेच आपोआप ज्योतिषाचा मार्ग चालतात...आणि 

अंतिमतः ज्योतिष देखील त्यागून ईश्वराचा बोध समजतात...!

..आपण पत्रिका बघायला जातो तेंव्हा लग्न;मुले बाळे;शिक्षण;पैसा;देह भोग आणि तत्सम गोष्टी ;ज्या 

मुळातच स्वार्थलोलुप आहेत आणि त्यांची परमावधी कितीही गाठली तरी सापेक्ष आणी 

अपूर्णच असते ;त्यांचाच ध्यास घेतो;तेव्हढ्याच विचारतो ;आणि ते सांगणाऱ्या माणसाला 

ज्योतिषी म्हणतो.!!..अर्थात ज्योतिष हे सारे सांगतेच..मानवी जीवनाच्या संकेतांबद्दल ..परंतु ते किती 

सूक्ष्म आणि महान आहे याचे ज्ञान कोणी करून घेत नाही आणि त्याला बाजारात विक्रीला ठेवलेल्या 

मालाप्रमाणे विकतात ह्याचा खेद होतो.. 

पण यापेक्षा माझा  आक्षेप आहे तो ज्योतिषाबद्दल जे पूर्वग्रह आहेत त्यांवर..आणि म्हणूनच 

लोकाना सुद्धा ज्योतिष काय हे कळत नाही..त्याची खरी ओळख होत 

नाही...आणि ज्योतिष सांगण्याचा सुद्धा एक क्षुद्र आणि मूर्ख धंदा 
झालाय..हेच घोर दुर्दैव.!!

.समाजातले "ज्योतिष" ईतक्या खालच्या थराला आणि बाजारभावाला

आलेय;कि ते चित्र पाहताना असे वाटते ;'कि, प्रत्यक्ष कल्पवृक्ष 

मस्तकावर असता..मनात लहान सहान ईच्छा धरून त्या पूर्ण 

व्हाव्यात अशी मुर्खासारखी वागणूक करणे व कल्पवृक्षा-तळी राहून 

अशाश्वत आणि हीन सुखांची मागणी करण्यासारखे होय..!!.मुळात दोष शास्त्रात 

नाहीये;तर ते धारण करू पाहणार्या माणसांत आहे...एक श्लोक आहे 

बघ ...."..यस्य नास्ती स्वयं प्रज्ञा!शास्त्रं तस्य करोति किम!!
    .....लोचनाभ्याम विहीनस्य ;दर्पण: किम करिष्यति?!!..

आंधळ्या माणसाला आरशात दिसत नाही ;हा आरशाचा दोष नसतो तद्वतच प्रज्ञाहीन मनुष्याला शास्त्रांचा काही उपयोग नसतो!!

म्हणून मी जरी ज्योतिष शास्त्र जाणतो ..तरीही  सर्वज्ञ नसल्याने मला 

ज्योतिष येते असे देखील म्हणायला धजावत 

नाही..आता,सर्वसामान्य कुंडली वगैरे बघणे हे मला कळते आणि 

बर्याचदा इतरांपेक्षा थोडे अधिक ..पण म्हणून मी स्वताला फार तर 

फलज्योतिष [मानवी जीवनापुरते ].सांगणारा असे म्हणू शकेन !
परंतु ..खरे आणि शुद्ध ज्योतिष इतके अरुंद आणि पवित्र मार्गावर 

चालते कि अजून मी तिथल्या पहिल्या पायरीवर तरी आहे का हे 

ईश्वरच जाणे!![[ आणि बरेच तथाकथीत ज्योतिषी अजून धड गणित 

आणि योग सुद्धा न जाणता भविष्य-कथनाच्या पाट्या दारावर 

लावतात..आणि  लोकांना आणि स्वतःला अज्ञानाचे धनी बनवतात ; 

हे अज्ञान बघून अत्यंत वाईट वाटते ]]]"

...........आता तू म्हणशील सगळेच ज्योतिषी अडाणी आहेत का?..तर याचे उत्तर असे कि ,ज्योतिषाचे गणित बहुतेकांना  
येते..राशी ;नक्षत्रे आणि काही नियम येतात ..त्यावरून सर्वसाधारण मनुष्याची रूपरेखा सांगता येते..इतकंच जर हे ज्ञान असते तर मी  एक सर्वश्रेष्ठ ज्योतिषी समजलो असतो स्वताला...ज्योतिष जे  तुला परिचयाचे आहे ते सुद्धा संपूर्णपणे कर्मावर आधारीत आहे...मुळात कर्म आणि नियती एकच असते ...जी नियती तेच कर्म आपण करतो..जी आपल्याला  प्रत्येक क्षणी होणारी बुद्धी असते तीच मुळात तीच नियतीचा आणि कर्मफलाचा एक भाग असते.. म्हणून कर्मसिद्धांत ज्योतिषाच्या विरोधी नाही [काहीना असे उगाच वाटते.!!.]..

ज्योतिष ज्या नियमांवर चालते त्या नियमांना मुळात स्वरूप  कसे प्राप्त झाले हे ज्यांना समजते ते खर्या ज्योतिर्विज्ञानाला जाणतात आणि त्यापुढे नतमस्तक होतात..!!मी अशा काही स्वानुभ्वान्वरून  हे सांगतोय,,आणि म्हणून मी ज्योतिष येते असे सुद्धा म्हणत नाही..जे काही पत्रिका वगैरे बघण्याचे काम मी करतो ते ईश्वराने काही  कौशल्य दिले आहे त्यावर ..आणि ते कौशल्य देवदत्त असल्याने ..मी सांगितलेले फलित योग्य येत असावे..!!पण खरच सांगतो यात सगळे श्रेय देवाचे आहे..किंवा त्या त्या वेळी मला होणार्या बुद्धीचे  आहे म्हण ;हवे तर..!!.लहान सहान मानवी घटना मी सांगू शकतो म्हणून मी काय किंवा कोणी काय महान ज्योतिषी झालाय असे म्हणणे म्हणजे "वाटीभर  पाणी पिणाऱ्या माणसाला समुद्रप्राशन करणारा अगस्ती ऋषी म्हणण्यासारखे आहे..!!..........काही कळलं का महाशय??""""
     
मित्र::--"अरे,तू जे बोललास ते सगळ ठीक..म्हणजे काही भाग नाही कळला ;पण तू कुंडली बघतोस ना? मी त्यालाच ज्योतिषी म्हणतो..बाकी आपल्याला काय पण नको.."


मी :--"काय बोलणार आता?..कुंडली बघू शकतो मी, पण तितकेच ज्योतिष आहे असे नसते..आणि नुसती कुंडली सुद्धा सगळ्यांना नीट कुठे कळते ?..ज्योतिष समजण्याची पहिली पायरी आहे ..गणित समजणे ;दुसरी आहे..योग आणि ग्रहमान आणि ईतर नियम  समजणे जे फल ज्योतिषाचे असतात ते!!..आणि हे ईतके सुद्धा वाटते तितके सोपे नाही....मुळात इथपर्यंत फक्त २५ टक्के ज्योतिष ज्ञान झाले असे समजूयात.आणि इतके सुद्धा व्यवस्थित येणारे अगदी दुर्मिळ लोक असतील,,...आणि ह्या पायरीपुढे सूक्ष्म ज्योतिषाचा आणि आत्मज्ञानाचा आणि ज्योतिषी माणसाच्या व्यक्तीगत अनुसंधांचा आणि उपासनेचा आणि तद्जन्न्य गोष्टींचा संबंध येतो...या पुढे सत्य आणि अचूक ज्ञान आहे..त्रिकाल ज्ञान म्हणूयात!! म्हणून मित्रा,ज्योतीषाचाच एक मूळ मंत्र सांगतो."--जे धर्म जाणतात आणि जे ईश्वर जाणतात तेच काळाला पार करतात...आणि कालज्ञान हेच खरे ज्योतिष आहे.--."

म्हणूनच वेदांमध्ये सांगितलंय,

*यथा शिखा मयुराणाम!!
 नागानां मणयो यथा !!
 तथैव सर्व-शास्त्रेषु ..
 ज्योतीषम मूर्धनी स्थितम.!! 

मयूर मस्तकावरचा तुरा जसा ;आणि जसा नाग माथ्यावरचा मणी ;
तसेच सर्व शास्त्रांच्याच्या ही शीर्ष स्थानी [उच्च स्थानी]..ज्योतिषशास्त्र  विराजमान असते...
.....अजून काय सांगू..!!..


................................लेखन -हर्षल

Saturday, October 22, 2011

!!माझ्या लेखनाची साठी उलटते ...तेंव्हा ..!!!

''साठ ...सिक्स्टी ..नालायका !! तुला काही लाज वगैरे??...

''अरे,आता त्यात लाज काय.."?

''वाचणार्यांच काय?..त्यांना किती पिडशील ;घोड्या?"'

''अरे ,मी काय जबरदस्ती करून वाचायला लावत नाही..''

''डुकरा;खोटे बोलू नकोस;माझ्या प्रोफाईल वर लिंक वर लिंक पाठवून हैराण केलंयस मला,आणि म्हणतोस .जबरदस्ती नाही.?..कुठे फेडशील ही पापे?""

"'मला वाटलं ;हृदयाला भावलं,म्हणून लिहितो रे मी'!!'

''तुझ हृदय का काय ते आहे ते,चुलीत घाल ,आणि..तुझ्या काळजाला [हा हलकट शब्द बरेचदा असतो रे तुझ्या लिखाणात ;बोकडा!!..काय लफड आहे हे काळ्जाच ??उलट्या काळजाच्या माणसा !! ]; कि काय असेल त्याला वेळच्या वेळी गप्प बसव,नाहीतर लोक फोडून काढतील तुला..आणि तुझ्या मंद ,बेअक्कल भावनांनासुद्धा !! ..लिखाण करतोय ..लिखाण ..दीड अक्कली..कुठचा!..मट्ठ.!!'' 

"'अरे तू वाचून तर चांगला आहे म्हणाला होतास..आणि काय ही भाषा तुझी?

"'अरे ऐतखाऊ टोणग्या; ही माझी भाषा फार सभ्य आहे....त्या लोकांचा विचार कर जे तुला रोज सहन करतायेत..तुझा फडतूस ब्लॉग वाचतायत..त्यांच्या कोमल मनाला केव्हढी शिक्षा..!!..निर्लज्ज माणसा,मानसिक ताणाबद्दल  आणि 'तुझे लंबे चवडे लेख आणि मद्दड कविता वाचून येणारी भोवळ'"..त्या बद्दल ; अशी दुहेरी फौजदारी केस ठोकतील न तुझ्यावर ते वाचक ,तेंव्हा तुझ्या आचरटपणाला असे मस्त रट्टे बसतील....आणि माझ्या प्रतिक्रियेबद्दल .म्हणायचं  तर ,.मी न वाचताच ;छान ;उत्तम असे लिहून ठेवायचो..;मनात म्हणायचो हा  बोकड दोन चार दिवस काहीतरी लिहील आणि गप्प बसेल !!..पण नाही ..हर्षल नामक सुस्त बोकड चरत गेला साहित्याच्या ऐसपैस कुरणात ..आणि साठ ..चक्क साठ लेख खरडून ठेवलेस....काय तर म्हणे 'हर्षायन''!!
कसलं हर्षायन रे ?...त्यापेक्षा मट्ठ बोकडाचे 'चरणायन"'..किंवा सुस्त अजगराचे ''सुस्तायन'..;नाहीतर मूर्खायन ..किंवा अगदीच लाज वाटत असेल तर '"डुक्कर मुसंडी ""...वगैरे नावे दिली असतीस तर शोभले तरी असते..हर्षायन म्हणे..!!....तुला वेळच्या वेळीच आवरायला पाहिजे होता रे...आता तरी सुधार आणि एक सुद्धा अक्षर टाईप करू नकोस...जरा लाज बाळग नरपुंगवा..!!!..सारखे तुझे ब्लॉग वाचायला लोक काय रिकामटेकडे आहेत का रे ...आणि परत जर लिंक पाठवलीस माझ्या प्रोफाईल वर ,तर घरी येऊन तुझा पीसी फोडेन..!!...म्हणून आजच्या  आज .ब्लॉग लिहीण बंद कर..आणि स्वतःला झेपतील तितकीच कामे कर .. ओके? ??..मला दिसले पाहिजे हां,कि बोकड आता चरत नाहीये ..नुसताच बसलाय नाहीतर, एका बोकडाची विनाकारण कत्तल झाल्याची बातमी परवा मीच छापेन ,तुझ्या वाचकांसाठी;तुझ्याच ब्लॉग वर..!!चल.बाय ..सी यु ...टेक केअर ..!! ""

.............chat window  बंद करून आणि फेसबुक वरून  लॉग आउट...करून मी घाम पुसला ..आणि माझ्या परममित्राच्या शिव्या आणि धमक्या गाळून ..विचार करू लागलो..!!..ब्लॉग वर ६० पोस्ट...दिसल्यावर ती साठी साजरी करावी म्हणून माझ्या चांगल्या मित्राला..सहज मेसेज केला ..आणि त्यापुढे त्याने जे काही केले ते आता वर लिहिलेच आहे....बोकड आणि मी असा जुनाच संबंध त्याने प्रस्थापित का केलाय हे मला अजून कळाल नाहीये ..पण आधीपासूनच मी एक बोकड आहे ह्या त्याने स्वताच निर्माण केलेल्या सिद्धांतावर त्याची अपार श्रद्धा आहे..तसा तो मला ईतर नावांनी सुद्धा [जनावरांच्या ]हाका मारत असतो ;परंतु बोकड ह्या प्राण्याशी जरा माझे जास्तच साम्य आहे असे त्याचे ठाम मत असल्याने ..ईतर नावे जरा मागे पडतात....असो..!!
      
                     त्याची सूचना जरा जास्तच भडक असली तरी त्यातले काही मुद्दे  मात्र विचार करण्यासारखे होते..उदाहरणार्थ मी ब्लॉग लिहून लिंक का पाठवतो.?..ती लिंक कोण वाचत असेल का ??.मुळात वाचतात कोणी;कि नुसतच बघतात..??..एक न अनेक शंका त्याने शिव्यांच्या आडून मला दाखवून दिल्या....मुळात मी लिहितोय का हाच मुख्य मुद्दा ..आणि लिहित असेन तर ते कोणी वाचतंय का हा दुसरा मुद्दा..!!..परत वाचल्यावर लोकांना कंटाळा येतो कि बोर होतंय कि आवडतंय  हे कळायची सोय नसल्याने ;आणि रिप्लाय देण्याची सोय असून फारच कमी लोक रिप्लाय देत असल्याने ;खरच कोणी वाचतंय कि नाही अशी शंका मला आली....पण मुळात हा ब्लॉग ..एक समाधानाचे साधन म्हणून माझ्यासाठीच मी जास्त वापरलाय....प्रसिद्धी साठी नव्हे !!..माझा ब्लॉग कमीत कमी एक वाचक तरी नेहेमीच राखून ठेवेल ;तो म्हणजे खुद्द मी...!!...बाकीच्यांनी तो वाचावा असे वाटते ..पण आग्रह नाही...वाचलात तर छानच..कुणाला तरी काही तरी आनंद मिळतो यापेक्षा जास्त अपेक्षा काय असते...??...आता लिंक बद्दल म्हणाल तर फेसबुक वर बर्याच वेळा मी लिंक पाठवत असतो..पण यासाठी कि मी जे लिहिलंय त्याचे मूल्यमापन दुसर्या व्यक्तीकडून व्हावे...आणि सुधारणा करायला वाव मिळावा..!!...मला सुधरण्याची एक सुद्धा संधी मी सोडत नाही....मला सुधारायच्या बाबतीत  मी अगदी निर्लज्ज असतो....लोक मला रागाने;विनोदाने जे काही बोलतात त्यातला राग किंवा विनोद मला समजतो ;पण त्याचा परिणाम माझ्या मनावर अजिबात होत नाही....उलट ती माझी चूक काय होती त्याकडे माझे सगळे लक्ष असते..आणि मी सुधारतो...!!.मी वर्गात शिकवत असताना..माझे व्हिडियो काढून ठेवलेत...ते पाहत पाहत अनेक वेळा बर्याच चुका कमी केल्यात ...असो..!!
                       
  सांगायचा मुद्दा हा ,कि मला स्वताचे परीक्षण अगदी कठोर परीक्षण करायला आवडते....आणि मी ते करतच असतो ;पण  तेच जर इतरांकडून झाले तर जास्त समाधान  मिळते..!!..म्हणून हा लेखन प्रपंच..आणि लिंक पाठवण्याचा उपद्व्याप..!!..पण खरी गम्मत पुढेच आहे..मला टीका आवडते हे मला समजले तरी सगळ्यांना नाही..आणि बरेच लोक तोंड देखली स्तुती करतात किंवा मोघम बोलतात...त्यांना सांगावे कसे हेच कळत नाही मला...!..त्यांना वाटत असेल एकदम चुका कशा काढायच्या?...म्हणून बिचारे इतरांशी जसे औपचारिकपणे वागतात तसे माझ्याशी वागत असावेत..!!..पण मी औपचारीकता अजिबात मनात नाही...मला राग येत नाही..[आला तर अगदीच क्वचित..आणि मग भयंकर.आणि कायमचा !!.पण फार वेगळ्या आणि निर्घृण गोष्टींबद्दल !!लहान सहन गोष्टींचा राग यावा इतक्या त्या भयानक नसतात !!]..आणि माझ्यावर केलेली मनापासूनची व प्रामाणिक टीका मला आवडते ;हे त्यांना कसे समजावून द्यावे हेच मला कळत नाहीये..!!...
                       
  ''साठी बुद्धी नाठी ''असे माझ्या ब्लॉग वरच्या साठ पोस्ट मला हळूच खुणावत तर नाहीयेत ना..अशी खात्री करून मी ही ६१वी पोस्ट लिहायला बसलोय....बुद्धी अजून नाठी झालेली नाहीये..आणि मला कंटाळा तर अजिबात आलेला नाहीये..[रिकामटेकड्या माणसाला कसला कंटाळा रे?..कंटाळा आम्हाला येतो तुझे लेख वाचून !;असे माझा परममित्र म्हणायला मोकळा आहेच].....चांगलं आहे ना !!..म्हणजे अजून तरी मला बरेच लिहिता येईल...आणि सगळ्याच वाचकांना मी वाईट लिहितो असे वाटत नसावे...कारण एक दोन चांगल्या प्रतिक्रिया पण आहेत...[त्या तुझ्याच स्वतच्या असतील ;बोकडा ...-इति आमचा दोस्त.]...आणि त्या वाचल्या कि वाटते आपण सोडून निदान काही लोक तरी हा ब्लॉग वाचत असतील..आणि त्यांना तो आवडलाय..!!सही आहे ..कीप अप देशपांड्या...असे मी स्वतालाच म्हणतो... !!...लिखाण करून माझा नवा जन्म होत असतो [मग ओळखा  बघू ?..मी साठ पोस्ट लिहिल्या,तर  किती वेळा पुनर्जन्म मिळाला असेल ते..!!आम्ही नाय सांगणार !!टुक टुक !!].....माझ्या ज्या  काळजावर जे घणाघाती घाव माझ्या मित्राने सुरुवातीलाच घातलेले मी लिहिलेत ;ते माझे काळीज  [ कुठे असते रे काळीज थापाड्या ?.प्रत्यक्ष दाखव बघू ;मतिमंदा !!काळीज वगैरे नसतेच शरीरात ..सगळं काम मेंदू करतो ;मट्ठ प्राण्या !! science  वाच गाढवा..शिकला नाहीस का biology ??--इति तोच मित्र ].....तर ते माझे काळीज जेंव्हा प्रेम आणि मानवता आणि जगलेले आजवरचे आयुष्य  शोधायला निघते तेंव्हा त्याला परिचित संवेदनाची जोड आपसूकच मिळते;समाज समजू लागतो;माणसांचे स्वभाव आणि स्वताचे वर्तन यांचे आकलन होते;आणि मग नव्या जाणिवांचे ज्ञान प्राप्त होऊन ;नव्या लेखनाचा विषय मिळतो....[[..ही असली वाक्ये लिहितोस ना तेंव्हाच तुला कान्फाडून काढावेसे वाटते रे,,,कसल्या जाणीवा रे ?काय शोधायला निघतोस रे?,!!..काय अर्थ आहे रे  ह्या लांब वाक्याचा..फालतू मनुष्या..तुला तरी कळलाय का बोकडा ??..ताबडतोब हा टारगट पणा थांबव ..नाहीतर तुला जाणीव वगैरे सोडच ,इतर कसलेही ज्ञान सुद्धा होणार नाही असा झोडपेन---इति तोच मित्र..]]......................तर असे माझे लेखन मला साठ पोस्ट नन्तर पण लिहायला प्रवृत्त करते...!!
...............................शेवटी समाधान एवढेच कि माझ्या लिखाणाबद्दल सगळेच लोक माझ्या परम -खवचट -मित्रासारखे विचार करत नाहीत.....म्हणून अजून लिहायचे त्राण आहेत....भान आहे..आणि माझे लिखाण वाचणार्यांवर अकृत्रिम प्रेम सुद्धा आहे.......हे प्रेम असेच राहील आणि माझा ब्लॉग सुद्धा ..[[ [जोवर इंटरनेट आहे ना; तोवर सगळ्या गमजा रे तुझ्या..!!..म्हणे ब्लॉग चालू राहील..!!..पैसे भर आधी इंटरनेटचे वेळेवर !!--- इति तोच [you know who ..]]]

.........................असो..शेवटी ब्लॉग काय किंवा आपण काय ..चालत राहावे हे महत्वाचे.....!!..आजकाल सगळ्या गोष्टी ''चालू ''असतात ..मग माझा ब्लॉग चालू असला तर काय प्रॉब्लेम??......असो लिखाण संपवतो..लोभ असावा हि विनंती ..!!............................................................
...........................................................................................सदैव ''तुमचा "'राहू इच्छिणारा  --हर्षल............
.

विशेष सूचना:----
माझ्या परम मित्राच्या धमक्यांना दुर्लक्षित करून मी परत आज लिहिलेय....पुढे काय घडेल सांगता येत नाही..तो त्याच्या शब्दाला जागला आणि स्वतची प्रतिज्ञा खरी करून बसला ...तर उद्या नक्की वाचाल एक बातमी,,.....""एक साक्षर ;निर्लज्ज ;बोकड लिहिता लिहिता यमसदनी गेला..:.....'''.....देवाजवळ प्राथना अशी कि ;असे काही होऊ नये................बोकडाला अजून बरच चरायचय ....!!! ...