Wednesday, October 5, 2011

"माझ्याबद्दल .."थोडेसे..सहज !! .

माझा ब्लॉग [त्याला मी प्रचारपत्र असे मराठी नाव शोधले आहे. ]..सध्या माझा श्वास झालेला आहे..
आपण विचार करतो आणि मनाशीच अनेकदा बोलतो..पण त्याने मनाचे समाधान होत नाही..मनाचे सूक्ष्म आणि रम्य आकांक्षा-तन्तू ज्याला दिसले आणि समजले असतील त्यांना हे कळेल..मनाची अपेक्षा व्यक्त होण्याची असते..सतत..निरंतर .उद्यमशील राहण्याची असते...म्हणून म्हंटले हा ब्लॉग मला खूप शांत ठेवतो..समाधान देतो....हा ब्लॉग जे कुणी वाचत असतील..[वाचक फारच थोडे आहेत..!!]..त्यांना मी माझ्यापरीने काहीतरी देतोय..असे माझे समाधान मी करून घेतो...माझी अपेक्षा माझे हृदय व्यक्त करण्याची जितकी आहे ,,..कदाचित तितकी प्रसिद्धी मिळवण्याची नाहीये.....
.......माझ्यातला हा जन्मजात विरक्त स्वभाव माझ्या अभिव्यक्त होण्याच्या स्वभावाविरुद्ध आहे..आतून मी फार शांत आणि विचाराधीन असतो..परंतु बाहेर तसे राहणे शक्य नाही..कारण आपली शांतता एखाद्याला दुख वाटेल .....आणि विनाकारण स्पष्टीकरणे द्यावी लागतील...समाजात निरनिराळे विचार प्रवाह सतत वाहत असतात..मी एक शिक्षक झालो ..मला अगदी अनपेक्षित असताना..आणि तेंव्हा मी हे मानवी स्वभावाचे कंगोरे फार अनुभवले..आजही पाहतो आहे...माझे ज्ञान ;माझे अल्पस्वल्प कौशल्य मी तिथे पणाला लावत असतो...हजाराहून अधिक विद्यार्थी मी शिकवले असतील..पण मी स्वताला गुरु म्हणून पाहिले नाही..पण वर्तणूक गुरुसारखी ठेवायचा यत्न केला..व तो जमून गेला..आज जी शुद्धता मला बाहेर दिसत नाही;वासनांचे जे थयथयाट सर्वत्र दिसतात त्यांतून माझे प्रबोधन अधिक झाले..व स्वताला अधिकाधिक पवित्र ठेवण्याचे माझे संकल्प अधिकाधिक दृढ झाले ...माणूस स्वताचा गुरु स्वताच होणे हे फार भाग्याचे लक्षण आहे..मला तितके भाग्य परमेश्वराने दिले ह्यात एक असीम समाधान आहे.. अजूनही मी अचूक किंवा सर्वथा निष्कलंक असेन असे नाही..पण "योग:कर्मसु कौशलम! ",,हे मी माझ्या मनात सतत स्मरतो..व कर्मे अधिकाधिक उज्ज्वल करण्याचा निश्चय बाळगतो...माझे मन किमान शुद्धतेचा व पावित्र्याचा ध्यास घेते व त्यासाठी मला शासन आणि प्रेम दोन्ही देते ..हे काय कमी आहे!!?.
     आणि म्हणून माझा मोठा लाभ असा झाला कि लहान सहान स्वार्थ ;धनाचा वा मोहाचा हव्यास ;क्रोध;काम आदि विकारांवर अंकुश ठेवणारा विवेक मला प्राप्त झाला ...तो प्राप्त झाला तरी त्याला अजून सक्षम व्हायचे आहे...अजून धर्म समजायचा आहे..अजून देव जाणायचा शेष आहे...अजून कितीतरी ज्ञान अनुभवायचे आहे...मी दोषविरहीत नसेनही ..मनुष्य जन्माला येणारा कोणीच नसतो..पण माझे दोष दूर व्हावेत आणि तेथे सद्गुण ध्रुव तार्यासारखे सुप्रतीष्ठीत व्हावेत इतकी  इच्छा करणारे मानस तरी मी निर्माण करू शकलो ..हेही नसे थोडके.!! अपराधांचे क्षमापन आणि ज्ञानाचे संजीवन एक ईश्वराखेरीज कोणाकडे मागावे..??..असो..म्हणून मी आस्तिक आहे ..आणि त्या अस्तिकतेचे वेगवेगळे स्तर पाहताना मीच आश्चर्यमग्न होत असतो..विज्ञान आणि धर्म जेथे एकत्र एकजीव होतात ते स्थान शोधण्याचा विचार आणि तत्त्वपृच्छा कधी उत्पन्न झाली ते ठावूक नाही..पण ईश्वराने घोर आणि अघोर असे दोन्ही रंग जीवनाला देऊन हे तत्त्वज्ञान मनात जिरवले असावे...!!..
    असो...अजून पुष्कळ लिहिता येईल..पण मी जास्त लिहायला गेलो तर शब्द सुनियंत्रित राहत नाहीत..तर असे माझे सारे जीवन..आणि त्यातला मी...जे जे पाहतो आणि अनुभवतो..त्याला व्यक्त करायला हा ब्लॉग थोड्या का प्रमाणात पण चांगला आहे...ईश्वराने दुखापेक्षा सुख जास्त दिले..आणि म्हणून त्या सुखी आणि तरीही अपूर्णतेचा आधार मिळालेल्या जगण्याचा अनुभव थोडा का होईना मी लिहून ब्याक्त करतो...आणि खरं सांगू..??..मनाला अतिशय आनंद होतो...समाधानाचा आणि समाज-संधानाचा ...!!
............अधिक लिहित नाही..लेखनसीमा..!!...............
................................................लेखन - हर्षल


No comments:

Post a Comment