Wednesday, October 12, 2011

.!!.................जेंव्हा मित्र नसतात ..........!!

अनुभवांचे ज्ञान किती पक्के असते,किती खरे असते,हे मी हळू हळू शिकलो,.
काही नाती इतकी तकलादू निघतील असे वाटले नव्हते ;पण ती नाती मोडून पडली डोळ्यांसमोर..आणि मी पाहत राहिलो..वाटले ,ती पुन्हा सांधतील आपोआप..!!पण अर्थात तसे घडत नाही ...मन मूर्ख असले कि अशा कल्पना त्याला सुचतात,स्वप्न रंजन हाच मनाचा स्थायीभाव असतो,पण ते सत्य नव्हे.!!
मी नेहेमीच क्षमाशील राहिलो आहे...कुणालाही आणि कितीही अवघड प्रसंग असेल तर मी स्वतःहून तेथे पोहोचलो आहे..मदतीसाठी..!..माझे मित्र फारसे माझ्या संपर्कात नाहीत,आणि घनिष्ठ तर एखाद-दोनच असतील..हा एक निष्पाप मैत्रीचा सुरेख धागा मला अजून विणता आला नाही..अगदी लहानपणापासुनच ..आजतागायत..!मी कधी कधी विचार करतो कि माझ्यासारखाच एखादा मनुष्य जर मला मित्र म्हणून भेटला असता तर किती जपली असती मी मैत्री.!!..अगदी लहान बाळाला जपावी तशी..त्यावर संस्कार करावेत इतकी हळुवार..!!..कारण माझ्यात काय गुण आहेत हे मी जाणतो..ज्यांना मी मित्र मानले त्यांना मी अंतर दिले नाही कधी..पण का कोण जाणे.?.त्यांचे माझ्याशी अंतरीचे बंध म्हणतात न ते कधीच दृढ झाले नाहीत..!!..मैत्री ही मैत्री न राहता केवळ परिचय उरला...आणि मी एकटा पडलो..!
        मी यावर आत्मपरीक्षण केले..कि आपलीच काही चूक असेल म्हणून "मैत्र जीवाचे"लाभत नसतील..मग मी चुका शोधायला लागलो...पण चुका घडतील इतके सुद्धा मी त्यांच्या जवळ कधी नव्हतो..कधी वेळ नव्हती तर कधी अजून काही...पण मैत्री जुळली नाही..!!काही मित्रांना चांगले सांगायला गेलो तर त्यांनी मला त्यांच्या मनातून नकळत "डीलीट" केले असावे...एकाला सांगितले दारू पीउ नकोस..तर तो म्हणाला तू नको येउस ना..आम्ही काय करायचा ते आम्हाला ठरवू दे यार....एक बंध तुटला..!!.....एका "मित्राने"एका चांगल्या मुलीला फसवायचा प्रयत्न केला.अगदीच भयंकर प्रकार घडू नयेत .म्हणून .त्याला आणि तिला दोघांना वेगवेगळे समजावले.. ती समजली पण तो मनात राग धरून बसला..अजून एक बंध तुटला..!!..तिच्या आणि त्याच्या घरच्यांन्नी धन्यवाद दिले मला ..पण तो आता मित्र मानत नाही मला.."".कर भला हो बुरा..""...!!असो..काही वेळा तर मी अति उत्साहाने काही नाती ,नुकतीच उमलू पाहणारी नष्ट केलीत कि काय अशी शंका येते...आणि विनाकारण मनात सल दाटतो..!!..एका मित्राला मी बर्याच काळानंतर भेटलो..म्हणून आस्थेने अधिक चौकशी केली..निदान मैत्री वाढवायचा हाच एक मार्ग मला ठाऊक आहे...अर्थात माझा मार्ग चुकीचा असेल तर त्याने तसे एकदा सांगितले असते तरी मी तो बदलला असता...पण कुठे माशी शिंकली कोणास ठाऊक?..नो contacts !!..परत फोन  नाही..कि ओळख नाही..!!..रस्त्यावर भेटला तरी ओळख दाखवेल का अशी शंका येते आता..!काय झालंय?..माहित नाही!!...एक दोन वेळा तर असेही घडलेय कि माझ्याच कोणी "हितचिंतक"मित्राने परस्पर माझ्या एखाद्या मित्र व मैत्रिणीला माझ्याबद्दल काही पढवून म्हणा किंवा काहीतरी सांगून म्हणा आमच्यातील नाते मोडण्याचे पुण्यकर्म आनंदाने केलेय..!!..यात गम्मत अशी कि मला हे कळल्यावर सुद्धा मी त्यांबद्दल वाईट विचार करू शकत नाहीत..!! ..
अर्थात हे कळल्यावर सुद्धा ते तसेच वागत राहतात..ह्याचे वाईट वाटते ...आपल्याला जी माहिती हवी ती त्या त्या व्यक्तीकडून प्रथम मिळवावी ..नंतर अगदीच शंका असल्यास इतरांना विचारावे..असा साधा नियम बरेच जण विसरतात आणि नकळत दूर होतात ;ऐकीव माहितीवर..!! प्रथम ओळख ..मग परिचय .मग मैत्री अशा पायऱ्या असतात..पण काही मला जवळचे वाटणारे लोक पहिल्या पायरीवरच मला धुडकावून निघून जातात..संबंध तोडून मोकळे होतात तेंव्हा त्यांना विचारावेसे वाटते"कि;बाबांनो ;तुमच्या अपेक्षा तरी सांगा!!..त्या गोष्टीतल्या शिबी राजा सारखे स्वताचे मांस काढून द्यायचे असेल तरी मी तयार आहे...पण काहीतरी का होईना पण "कारण" सांगून तरी goodbye  म्हणा.!!..विनाकारण माझ्या आपुलकीची अशी लक्तरे करण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला?,मी चुकलो असेन तर तसे सांगा,माझे बोलणे पटत नसेल तर तसे सांगा ,पण सांगून निघून जा."!!..............पण हे सार्यांनाच कळते असे नाही...आणि ज्यांना कळावे असे आपल्याला वाटते त्यांनीच असे वागले तर धक्का बसतो..विनाकारण मैत्रीची अवहेलना ही एका व्यक्तीची अवहेलना असते हे त्यांना उमगत नाही का?..कि आपल्याच धुंदीत हे सगळ्या जगाला मोजत असतात?..मी कधीही अशांचा राग धरला नाही,,तो माझा स्वभाव नाही..आणि राग करावा यासाठी किमान त्यांनी  काही मैत्री तोडण्याचे कारण तरी द्यायला हवे..ते सुद्धा नसते...मग मी काय समजायचे?..आजही मी त्यांना मित्र मानतो..फक्त गरज आहे त्यांचा एक हात पुढे येण्याची...माझा मैत्रीचा हात कधीच मागे नव्हता.आजही नाही..!!..
...माझे मित्र किंवा सुहृद कमी असले तरी ओळखी चिकार आहेत...अगदी सगळ्या जाती- जमाती ;सगळ्या वयांच्या लोकांमध्ये ..माझे कित्येक विद्यार्थी तर हवे तेंव्हा घरी येतात;फोन करतात ;त्यांच्या व्यथा त्यांचे आनंद सांगतात...मी त्यांना आधार देतो ;समजून घेतो..!!..त्यांना मी मित्र मानतोच..पण तरीही ते नाते गुरु-शिष्य असे अधिक असते...मित्र म्हणून कमीच..!


मी बहुश्रुत आहे;म्हणून वाचनसुद्धा अधिक घडले असेल;एकांतात राहून सहज प्राप्त झालेले ज्योतिष ज्ञान  ;धर्म;आणि ईतर विषयांचे विचार आणि विज्ञान यांचा जो काही संगम झाला असेल त्यानुसार मी अनेकांना यथामती सहकार्य देत असतो..! काही तत्वे अशी असतात कि ती आपल्यासाठी फलदायी नसतात पण आपल्यामुळे इतरांना मात्र तशी ठरतात ..मैत्री हे असेच एक तत्व मला लागू पडते..माझ्यामुळे काही लोक [जे पूर्वी शत्रूदेखील होते ते] उत्तम मित्र झाले..!! पण मला स्वतःला मात्र माझाच सल्ला निरुपयोगी ठरला असावा....[एकादशे शानिश्चरो मित्रहीनो सदैवच !!- ईति ज्योतिष- म्हणजे अकराव्या स्थानातील शनी पत्रिकेत असता मित्रहीन असा जातक असतो ]........असो..

हे सगळे मी लिहिले कारण शेवटी बोलायला कोणी नसलं कि माणूस लिहितो..हे कोणी वाचेल कि नाही ठाऊक नाही मला..पण अशीच  कोणी माझ्यापासून दुरावलेली मित्रव्यक्ती  अचानक हे वाचेल तर एव्हढेच विचारतो "दुराव्याचे कारण नक्की समजू शकेल का?.आणि तेही न सांगता परत आल्यास तरीही माझ्यातर्फे स्वागतच आहे..मनात उगाच काही ठेउ नये...माझ्या मनात राग किंवा किंतु नाहीच ..पण तुमच्या मनात सुद्धा तसे काही आणू   नका.."मानव्य"किंवा "मानवता" प्रेम देण्यात आहे..अकारण दुरावा निर्माण करण्यात नाही..

'पोथी पढ पढ जग मुअ पंडीत भया न कोय...
 ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडीत होय.""
सो लेट्स बी फ्रेंड्स !!""........
------------------------------------------------- लेखन-हर्षल

1 comment: