Thursday, October 6, 2011

विशेष मनाचे श्लोक ...!!

अनाथा दिनाकारणे जन्मताहे .....
कलंकी पुढे देव होणार आहे..!!
तया वर्णिता शीणली वेदवाणी ..
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी !!

मना वासना वासुदेवी वसो दे .
मना कामना कामसंगी नसो दे ..
मना कल्पना वाउगी ते नसो दे..
मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे !!

विचारोनी बोले;विवंचोनी चाले;
तयाचेनि संतप्त ;तेही निवाले..
बरे शोधल्यावीण बोलो नको हो;
जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो..!!

मना सांग बा रावणा काय जाले;
अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले;
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी;
बळे लागला; काळ हा पाठीलागी;!!

भजा राम विश्राम योगेश्वराचा;
जपू नेमिला नेम गौरीहराचा;
स्वये नीववी तापसी चंद्रमौळी ;
तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी..!!

तया  द्रौपदीकारणे लागवेगे .!!
त्वरे धावतो सांडूनी सर्व मागे..!!
कळीलागी झाला असे बौद्ध मौनी ..!!
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ..!!  


मनाची शते ऐकता दोष जाती..
मतीमंद ते साधनायोग्य होती..
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ;
म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी!!

विधीकारणे जाहला मत्स्य वेगी  
धरी कूर्मरूपे ;धरा पृष्ठभागी;
जना रक्षणाकारणे नीच योनी;
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी..!!.......सद्गुरू श्री समर्थ रामदास  ..............................................स्वामी !!

No comments:

Post a Comment