आयुष्यावर बोलत बसलो ...राहून गेले जगायचे..
ओंठान्वर्ती उरले गाणे अर्थ हीन आभासांचे..
रानानमधले राकट जगणे ;शब्दामधूनी लिहिले..
जंगल सारे खरे कधी ना पायांखालून गेले..!!
हाती उरले शब्दच केवळ ;अर्थ निसटूनी गेले..
नंतर कळले सरतेशेवट..हात रिकामे उरले..
खेळ मनाचा भावनेतला असाच खेळत बसता..
कितीतरी प्रसवून ठेवल्या ;मोठ्या मोठ्या कविता ..!!........लेखन -हर्षल
No comments:
Post a Comment