Thursday, October 6, 2011

निरर्थक काव्य.....!!

आयुष्यावर बोलत बसलो ...राहून गेले जगायचे..
ओंठान्वर्ती उरले गाणे अर्थ हीन आभासांचे..


रानानमधले राकट जगणे ;शब्दामधूनी लिहिले..
जंगल सारे खरे कधी ना पायांखालून गेले..!!

हाती उरले शब्दच केवळ ;अर्थ निसटूनी गेले..
नंतर कळले सरतेशेवट..हात रिकामे उरले..
खेळ मनाचा भावनेतला असाच खेळत बसता..
कितीतरी प्रसवून ठेवल्या ;मोठ्या मोठ्या कविता ..!!........लेखन -हर्षल

No comments:

Post a Comment