Tuesday, January 31, 2012

मग माझा जीव ..........!!

दुखाच्या वाटेवर गाव तुझे लागले 
    थबकले न पाय तरी ;हृदय मात्र थांबले ....!!

वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली..
     अन माझी पायपीट डोळ्यांतून सांडली....

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल..!!
        अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल...!!

सहज कधी तू घरात लावशील सांजवात ..
           माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल .....!!
=================================================सुरेश भट.........

Monday, January 30, 2012

अग्निपथ ..!!!!

तू  न  थकेगा  कभी ...
तू  न  मुड़ेगा  कभी....
तू  न  थमेगा  कभी.....
कर  शपथ !.. कर शपथ !...अग्निपथ !!


ये  महान  दृश्य  है ..
चल  रहा  मनुष्य  है...
अश्रु , स्वेद , रक्त से ..
लथपथ .. लथपथ ...!!

....अग्निपथ !!अग्निपथ !!अग्निपथ !!

--------------------------हरिवंश राय बच्चन ..[अग्निपथ]

Tuesday, January 3, 2012

अंतिम चरण लेखमालेतील उतारा !!...from my writings ..



अंतिम चरण ::लेखमालेतील उतारा 
            from my writings
                 
              स्वप्न-भंग

तो:--- [स्वतःच्या हातातील 'ती'चे छायाचित्र खिन्नपणे वाहत्या पाण्यात सोडून देतो..चित्र सावकाश नजरेआड होते.. आणि तो किनार्याजवळ  एका पाषाणावर बसून बोलत आहे !!]

"" एक अलिखित करार तुटला...

एक बंध कायमचा तुटला.......

एक नाद कायमचा सुटला.....
एक आशावाद कायमचा फुटला...

एक घाव कायमचा बसला ...
एक व्रण कायमचा उठला ....
अशा जखमा ;असे आघात ....
अशी वळणे ;असे अपघात ....
तसे कमी येतात जगताना...हीच देवाची दया...
नाहीतर ...माणसे कधीच हसू शकली नसती...


जाऊ देत ........
तुला काय कळणार म्हणा...!!
आघात करणारे बहिरे असतात ...
अन सोसणारे नेहेमी मुके ...
माझ्या आयुष्याची होळी झाली तरी....
त्या धुराचा गंध देखील येणार नाही अशा दूरच्या सुखतृप्त
प्रदेशांत तुझा निवास आहे .......... ....


आपण अपरिचित होतो.....
आणि तसेच राहणार...परिचय असून सदैव अपरिचित राहिलेले आपण .......


असेच राहू .....दिगन्तापर्यंत.....किमान आपले आयुष्य संपेपर्यंत...


अर्थात हे सुद्धा माझे मत आहे.......


मला येईल सदोदित तुझी आठवण..
मला वाटेल अस्वस्थ हुरहूर तुझ्या नावाने...
आणि व्याकूळ होतील माझे प्राण ....
उधळून जातील माझे प्रत्येक क्षण भविष्यातले ;जेंव्हा जागी होईल तुझी स्मृती माझ्या मनांतून.........

पण हे फक्त माझे आणि माझेच मत आहे..........



तुला कल्पनाही नसेल...तुझ्या स्वर्गामध्ये ;तुझ्या अपार सुखांमध्ये ...रममाण असशील तू...!!

पण जर कधी बघशील चुकून ..तुझ्या स्वर्गातून डोकावून खाली ..!!

तर जळलेली वैराण अस्वस्थ धरणी दिसेल एका आयुष्याची....


मी तिथेच असेन...एकटा..जळणार्या दुःखांना मस्तकावर घेत धडाडून जळणारा ..शांत ..निराश्रित !!......  





........................संदर्भ :-"तो आणि ती "

या माझ्या लेखमालेतील अंतिम भागातील एक उतारा....
======================================लेखन - हर्षल!!
शोकरस हा नवरसांमध्ये अति महत्वाचा आहे..त्यावर आधारीत हे लेखन आहे...






विशेष सूचना...""..वाचून झाल्यावर आकांड-तांडव करून रडू नये!!...लेखाचा लेखकाच्या जीवनाशी संबंध लेखानापुर्ताच आहे...लेखक सुस्थितीत आहे...प्रसंग काल्पनिक आहे..कळावे..