Tuesday, March 27, 2012

!!.........कल्याण करी रामराया ......!!

कल्याण करी रामराया ..
जनहित विवरी !!जनहित विवरी..!! कल्याण करी रामराया ..


तळमळ तळमळ होतची आहे ...
तुझा तूच सावरी ..दयाळा ...!! कल्याण करी रामराया ..


अपराधी जन चुकतची गेले ..
हे जन हाती धरी ..दयाळा ..!! कल्याण करी रामराया ..
   

कठीण त्यावरी कठीणचि जाले..
आता न दिसे उरी दयाळा.....कल्याण करी रामराया !!

कोठे जावे काय करावे ;
आरंभिली बोहरी ;दयाळा ....कल्याण करी रामराया !!

दास म्हणे आम्ही केले पावलो ..
दयेस नाही सरि...दयाळा ...कल्याण करी रामराया !!
----------------------------------समर्थ रामदास स्वामी !!
   
 

Thursday, March 8, 2012

!!!!! गदिमा आणि मी ..!!


गदिमा हे नाव मी अगदी लहान  म्हणजे सुमारे सात आठ वर्षाचा असताना प्रथम ऐकले असेल..नावाचा अर्थ तेंव्हा कळला नाही.नन्तर कळले कि ते एका माणसाचे नाव आहे.हळू हळू कळले कि ते एक फार मोठे कवी होते...

आणि साधारण सोळाव्या वर्षी समजू लागले कि अर्वाचीन युगातील मराठी काव्यप्रतिभेचा तो सर्वोच्च मेरुशीर्ष आहे....विसाव्या वर्षी खात्री पटली कि वेदकाळात लुप्त झालेली प्राचीन सरस्वती 
ग. दि. माडगुळकर या नावाच्या महाराष्ट्राच्या एका साध्या देशस्थ ब्राह्मण कुलोत्पन्न भाषाप्रभूच्या हृदयात आपली शब्दसंपदा घेऊन पुन्हा प्रकट झालेली आहे. 
 मी गीतरामायण ऐकले ते तुकड्या तुकड्याने..मला ते आवडले देखील ...पण नन्तर मी जेंव्हा ते वाचले अगदी एकटेपणाने मनस्वीतेने तेंव्हा प्राकृत मराठमोळी भाषा "अमृतातेही पैजा "कशा जिंकते ;इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष देववाणी सुद्धा इतकी सहज पणे प्राकृतातून कशी उर्जस्वला होऊन भावदायिनी होते;या आश्चर्यमग्न करणार्या वस्तुस्थितीचे मला जिवंत दर्शन झाले.
गदिमांच्या लेखनाइतके नितांतसुंदर ;भावपूर्ण आणि लयात्मक काव्यलेखन अत्यंत दुर्मिळ आहे.काव्य मोजण्याच्या अनेक मोजपट्ट्या असतील ,आणि म्हणून अनेक कवींना काव्यलेखनात उत्तम मूल्य प्राप्त करून दिलेले आहे .परंतु या सर्व उत्तमोत्तम कवींमध्ये गदिमांच्या काव्यलेखनाचे मूल्य प्रथम स्थानावर "स्वयमेव मृगेन्द्रता"या न्यायाने सुप्रतिष्ठीत झालेले आहे.
गदिमांचे काव्य वाचणे म्हणजे मनाला प्रत्यक्ष शारदेच्या महान शब्द-भवनातून विहार घडवून आणणे.इतके सुंदर;इतके प्रभावी ;इतके नेमके आणि इतके उच्चार-सहजतेने नटलेले शब्दशिल्प पाहणे;वाचणे आणि अनुभवणे हीच एक अपूर्वोत्तम गोष्ट आहे........!!
गदिमांचे काव्यलेखन म्हणजे "इथे थांबती तर्क वेदमय "असे ज्या पर-ब्रह्माबद्दल म्हंटले जाते तसेच अलौकिक आणि अद्वितीय असे आहे.


गदिमांचे काव्य शब्द;स्वर आणि भाव याबरोबरच एक संतत्वाचा स्पर्श घेऊन आलेली तरलता दर्शवते...

"ज्ञानियाचा व तुक्याचा 
तोच माझा वंश आहे..
माझिया रक्तात थोडा 
ईश्वराचा अंश आहे.!!".....असे त्यांचे स्वताचे उद्गार असत्य नव्हेत..!!
साधे शब्दच पण त्यांची अशी बेजोड आणि अपूर्व रचना मी अद्याप पहिली नाही..
गीत रामायणात सुग्रीव रामाला म्हणतो कि आजपासून मी तुझा मित्र झालो तेंव्हा गदिमा लिहून जातात 
"दुखीच साह्य होतो दुःखात दुःखीताच्या ".केवळ अपूर्व !!

किंवा राम रावण वधानंतर सीतेस म्हणतो :
"किती यत्ने मी पुन्हा पाहिली तूते लीनते चारुते सीते "
किंवा त्याच काव्यात प्रभू श्रीरामाचा पराक्रम किती जाज्वल्य होता हे गदिमा एका ओळीत लिहितात ;"
श्रीराम म्हणतात सीतेला..
"शब्द्दांची झाली पूर्ती 
 निष्कलंक झाली कीर्ती 
पाहिली प्रियेची मूर्ती 
मी शौर्याने वाकविले दैवांते"  ....
 मी शौर्याने प्रत्यक्ष दैव वाकवले ह्या एका वाक्यात तो राम पराक्रम नजरेपुढे साकार होतो...

गदिमांचे लेखन आणि शब्दकळा ;भाषेवर प्रभुत्व केवळ अप्रतीम आहे ईतकेच नव्हे तर त्यांचे तत्त्वचिंतन आणि उत्तम प्रतिभा केवळ अजोड आहे...!! गदिमा आणि मी       

Tuesday, March 6, 2012

गदिमांच्या गीतरामायणातील एक कडवे..!!

:माझे आवडते वाक्य :----
गदिमांच्या गीतरामायणातील एक कडवे..!!
राम सीतेला म्हणतो :

संपले भयानक युद्ध 
दंडीला पुरा अपराध 
मावळला आता क्रोध 
मी केले जे ;उचित नृपांते होते..!!

 शब्दांची झाली पूर्ती 
निष्कलंक झाली कीर्ती 
पाहिली प्रियेची मूर्ती 
मी शौर्याने वाकवीले दैवांते..!!!