Monday, July 23, 2012

!!....स्मृतीशिल्पे ...!!

स्मृतींना संसर्गाचा दोष लागत नाही।..
त्या तशाच निर्व्याज...सतेज आणि स्पष्ट राहतात......

माणसाला वर्तमानाचे जगणे जगावे लागते ..पण स्मृतीन्मधले  जीवन भोगावेसे वाटते ..!!
आशा आणि निराशा या दोन भगिनींनी विणलेल्या अस्पष्ट भविष्या पेक्षा जुने स्मृतीचीत्रांचे निश्चित आणि स्थिर दर्शन म्हणूनच आनंददायी असते ..!!

माणसे म्हणजे कधीकधी भूतकाळावर जगणारी श्वापदे वाटतात तर कधी भविष्याच्या अदृश्य आसक्तीने पिसाटलेली जनावरे.....पण या दोन्ही विश्वांचा दुवा म्हणजे वर्तमान ;तो मात्र माणसाला जगता येत नाही...!!...असो।.

स्मृतींचा आणि माझा संबंध अगदी दृढ आहे।....काही गोष्टी मला मुळीच आठवत नाहीत तर काही मात्र काळजावर कोरून ठेवल्यासारख्या ....अगदी जशाच्या तशा... 
काही स्मृतींनी वेदना होतात ..तर काहींनी आनंद ....काही अशा अबोध आणि मूक आहेत कि त्यांना काही रूप ;भाव नाहीच...!!..नुसत्याच निर्जीव चित्रांसारख्या .....स्पष्ट !!....पण अर्थहीन.!!

लहानपणी शाळेत बसने जाताना अगदी सकाळचा चंद्र धावत्या खिडकीतून वळून वळून बघ्तानाच्या आठवणी.....
नवीन पुस्तके आणि वह्या हातात घेतल्यावर होणारी अस्पष्ट कोवळी भावना ...
शाळेतल्या प्रांगणात पावसाळ्यात साचणारे पाणी ...शाळेतल्या प्रार्थना ...बाईंची होणारी धावपळ ...शाळेत केलेली मस्ती आणि आपोआप झालेला अभ्यास ...............!! आईला घरी यायला उशीर झाला कि मनाची होणारी तगमग. 
आईला आज शाळेत घडलेल्या गोष्टी सांगण्याची झालेली घाई .....दररोज लागणारी क्रिकेटची आंतरिक ओढ .....मैदानावर घालवलेले अंग घामेजून टाकणारे ते उन्हाळे आणि त्यातले क्रिकेटचे सामने।...

थोडे वय वाढल्यावर तारुण्याची होणारी जाणीव आणि धर्माची वाढलेली आस........!..अनेकानेक पुस्तकांच्या सहवासात घालवलेले सोनेरी दिवस।....तासंतास केलेले विचारमंथन।.......
एकांतात घालवलेले उपासनांचे अस्वस्थ् दिवस....परमेश्वराची अदृश्य ओळख .....!!

आणि मग झालेले स्थित्यंतर ...आणि समाजात जगण्याची आलेली एक दृष्टी.....असत्य आणि सत्यांचे मिश्रण दूर करण्याची धडपड...आणि एक किमान एक तरी मिळालेले निसंदिग्ध आश्वासन आणि भगवंताचे प्रेम..!!

अभियांत्रिकीच्या अभ्यासात झालेले त्रास आणि आनंद  आणि त्यावर झालेली यशस्वी पूर्तता ...!! आणि शिक्षक म्हणून झालेली अनुभवप्राप्ती.....मिळालेले प्रेम ..समजलेले अनुभव।..आणि बरेच काही ...............

प्रेम ..आयुष्यात समजलेले सर्वात सुंदर सत्य...आणि त्याची सामान्य ओळख ...!!...आणि समजलेले प्रेमाचे सुंदर रूप....  प्रेमाची जाणवलेली भावना....!!
 .......आठवणी खूप सांगून जातात ....आणि कित्येकदा निशब्द करतात......पण म्हणून  त्यांच्यावरचे प्रेम सरत नाही आणि त्यांच्याशिवाय कधी कधी करमत  देखील नाही ..!!

शेवटी आसपासचे माणसांचे व्यवहार जनावरी आणि अनावर झाले;आनंद किंवा दुख असह्य झाले;कि स्मृतींची सुंदर शिल्पे डोकावून बघायला अंतकरणात खोल सूर मारायला मी सदैव तयार असतो।...........ही स्मृतीशिल्पे काळाने घडविली असली  तरी आता त्यांवर माझी मालकी आहे..कायमची ..अगदी अंतापर्यंत.!!!  
-----------------------------------------------------------लेखन --हर्षल ------------------------------

No comments:

Post a Comment