वाहतात अजून वात चंद्र नभी जागता
अजून धुंद होय धरा पौर्णिमेस पाहता ।
वासंतिक गान अजून आम्रवनी गुंजते
अजुन हि नभामधून इंद्रधनू रंगते
आजही फुलाफुलांत तोच जुना गोडवा
आजही सुरासुरांत तोच जुना ताजवा
अजूनही धरेवरी सृजन नित्य जन्मते
अजुनही मनामनांत प्रेम शांत तेवते ….
ईश्वरास अजूनही मान तोच लाभतो
मानवार्थ आजही देव जन्म धारतो
जोवरी जगामध्ये सत्यमेव विजयते
तोवरी असेच सुख नित्य येथ नांदते !!
==================== लेखन हर्षल ===================
No comments:
Post a Comment