जयाचा जनी जन्म नामार्थ झाला
जयाने सदा वास नामांत केला !
जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती !!
भगवंताला आम्ही फसवतो का ??. नव्हे तर आपणच आपल्याला फसवीत असतो !!सत्कर्म करणे हेच आपले ध्येय असावे ।!! दुरिताचा शेष मनात असेल तोवर शांती आणि प्रसन्नता वाटणारच नाही !
आपण चुका करतो ।पापे करतो …. परंतु त्याबद्दल आपणास जाणीव होऊन या दोषांचा परिहार करण्यासाठी आणि पुनरुक्ती टाळण्यासाठी ईश्वराला
सरळ शरण जाणे आणि सत्कर्मांची शपथ घेणे …अतिशय महत्वाचे आहे !! दुष्कर्मे नरकासमान… नव्हे नव्हे तर प्रत्यक्ष नरकच असतात !!सत्य ,प्रेम;दया, सहिष्णुता आणि भगवंताचे प्रेम ;त्याच्या नामाचे प्रेम आपल्या हृदयात म्हणूनच सदैव जागृत असायला हवे !! आपले आयुष्य ईश्वर मय झाले कि त्या देवाची खरी कृपा आपल्याला समजते !!आपण देवाला सांगावे कि तूच केवळ माझा तारणहार आहेस !!।तुझ्या नामाचे प्रेम मला दे !! आणि माझ्या हातून सत्कर्मे घडतील अशी सुबुद्धी मला दे!!अज्ञानामुळे आणि मायेच्या प्राबल्यामुळे हातून अनुचित कार्य घडलेच तर त्यातून आमचे रक्षण कर आणि अशा दुरिताचा पुन्हा उद्भव होणार नाही असे मार्गदर्शन हे ईश्वरा , तू आम्हाला कर !!
आपले आयुष्य प्रकाशमान आणि सुसंपन्न करण्यासाठी परमेश्वराचे खरे प्रेम आणि भक्ती मनात निर्माण व्हायला हवी !! संत हेच काम करतात !!
श्री स्वामी समर्थ ,श्री ब्रह्मचैतन्य महाराज , साईबाबा हे आणि असे अनेक परम साक्षात्कारी योगी ,साधू ,संत हे भगवंताचे प्रत्यक्ष दिव्य स्वरूप अनुभवलेले व तसेच परम थोर स्वतः झालेले असे प्रत्यक्ष ईश्वरपुरुष होत !!
ह्या अशा विभूती माणसाला त्याचा अगदी हात धरून परमेश्वरापर्यंत घेऊन जातात … मोक्षाचे आणि कैवल्याचे अलौकिक धन मुक्तपणे वाटतात ! ह्या विभूतींवर मी काय बोलावे !! माझी ती पात्रताच नाही !!मी इतकेच जाणतो कि हे आमचे सद्गुरु आहेत !
त्यांची कृपा आणि आशीर्वाद , त्यांचे पवित्र नामरूप अस्तित्व आमच्या मनाला शुद्ध आणि सत्वशील बनवते!त्यांचा किमान एक चांगला भक्त तरी मला होता यावे अशीच इच्छा आहे !!
……अजून काय लिहू !!
सद्गुरु कारणे तरलो अजुनी !
अन्यथा पतित काय जगे !!
अशीच वस्तुस्थिती आहे !!
शेवटी त्या परमेश्वरी शक्तीला एकच मागणे …
मत्सम: पातकी नास्ति
पापघ्नी त्वत्समा नही !
एवं ज्ञात्वा महादेवी
यथा योग्यं तथा कुरु !!
-------------'शंकराचार्य स्वामी
अर्थात---
" मज सारखा पापी अन्य कोणी नाही आणि हे जगदंबे तुझ्यासारखी पाप नाशक पुण्यवान शक्ती देखील अन्य कोणी नाही ….! हे जाणून ,हे महादेवते माते, जसे तुला योग्य वाटेल तसे कर !!"
------------- लेखन -हर्षल (२८/०८/२०१५)