Sunday, August 14, 2016



कधी कधी उत्तरे नसणारे प्रश्न पडतात ..
आणि कधी कधी सुटलेल्या 
प्रश्नांची उत्तरे हरवून जातात !
आयुष्यभर जे जपलेले असते ते कधी कधी 
एका क्षणात उध्वस्त होते ...
तर कधी कधी जे वाटले ही नव्हते 
तेच अचानक मिळते !

सध्या चांगल्या लोकांसाठी जगणे
तसे सोपे रहिलेले नाहिये हे मान्य  !
परंतु ह्या सगळ्या विचित्र परिस्थितीत 
एकच गोष्ट स्थिर असावी आणि ती म्हणजे
आपला चांगुलपणा आणि आपले चारित्र्य !!
माणसे बदलतील ....जीवलग लोक दूर जातील ...
जुनी नाती तुटतील.. नवी जुळतील !!
संकटे येतील अथवा सुख मिळेल ..!!
काहीही आघात झाले तरी आपण
आपला चांगला स्वभाव सोडू नये !
 परमेश्वरापुढें आपली किंमत आपण
केलेल्या त्यागावर अवलंबून असते !
स्वार्थावर नाही !!

Saturday, April 2, 2016

Aai !!

A poem on mother by her daughter !!

आई तुझे माझे सांग ;नाते सांगु कसे?..
तुझ्याविना जगामधे काय माझे असे ??

जपलेस उरापोटी किती ग मायेने !!
वाढवीले मला आई ;तुझ्याच प्रेमाने !!
तुला वाटे बरे ; येता माझ्या ओठी हसू!!
माझ्यासाठी विसरलीस डोळ्यातील आसू !!

तुझ्यासाठी होते ,मीच किरण आशेचा ..
माझ्यासाठी सोसलास त्रास तु जगाचा !!
कसे फेडू पांग आई तुझ्या या मायेचे?
जन्मले मी तुझ्यापोटी ; आभार देवाचे !!

आई तुझ्या कुशीमधे आभाळ प्रेमाचे !!
 आई तुझ्या दर्शनात ;दर्शन देवाचे !!
तुझ्या वाढदिवसाला एकचि मागणे !!
जन्मोजन्मी मला तुझ्या पोटी जन्म देणे !!

तुझे दु:ख व्हावे दूर ..वेदना सराव्या  !!
तुझ्या जीवनात सरी सुखाच्या ग याव्या !!

________ by harshal 

Wednesday, March 23, 2016

Ajunahee...!!

अजूनही दिलांचे ते धडकणे तसेच..
अजूनही फुलांचे अन उमलणे तसेच..!!

अजुनही उगाच शांत सांज पेटते कधी ..
अजुनही ढगांचे उंडारणे तसेच....!!

अजूनही ऋतू वसंत बहर ओततो..
अजूनही कळ्यांचे ते लाजणे तसेच...!!

अजूनही मनात स्वप्न रात्र फुलवते...
स्वप्नांचे त्यानंतर ...मोडणे तसेच...!!

-------------------===--------हर्षल ..!!

Dhyas !!

आता जुन्या स्मृतींचा  मिटवून वाद जाऊ...
आता पुन्हा स्वत:चा सजवून काळ घेऊ ..!

एकाच सोनपंखी स्वप्नास पाहणार्या ...
नयनांस स्वप्न दुसरे आता नवीन दावू....!!

कळ काळजात आहे..राहो तिथे सुखाने ..!
दु:खावरी सुखाचे लोटून भार देऊ !!.......

---------------------------हर्षल !!

Friday, February 26, 2016

जेंव्हा  प्रश्नांची उत्तरे नसतात 
तेंव्हा नवे पेच पडतात 
आणि पुन्हा एकदा काळजावर
नवे ताव चढतात … 

Lezim !!

"मंगल देशा पवित्र देशा " असे ज्या महाराष्ट्र भूमीचे वर्णन केले जाते , त्या या छत्रपतींच्या भूमीत १४ विद्या आणि ६४ कलांची उपासना फार प्राचीन कालापासून होत आलेली आहे। इथे महाराष्ट्रात संस्कृती धर्मा मधून बहरत गेली आणि माणसे संस्कृतीतून घडत गेली ।!
अशा या बहुरंगी संस्कृतीमध्येच अनेक मर्दानी खेळ आणि सुंदर लोककला निर्माण झाल्या …. लेझीम हा त्यातलाच एक मनोहर आविष्कार !!
खेळ आणि संगीत …ताल आणि ठेका …। नृत्य आणि कवायत …य़ा सगळ्याचा सुरेख संगम आपण लेझीम खेळताना पाहू शकतो ।!!
लेझीम साधारणपणे ५०० वर्षांपूर्वी सुरु झाली असावी असे काही पुरावे दाखवतात …एका काठीला जोडलेले
घुंगरू किंवा धातूच्या झान्झा असे मूळ रूप असावे !
आज मात्र आपण जी लेझीम पाहतो हे त्याचे रूप सुमारे १०० ते  १५० वर्षापासून चे आहे ! लेझीम हा एकट्याने करण्याचा खेळ प्रकार नाही …. तर सांघिक आहे  आणि सर्वानी मिळून एकत्र खेळण्यातच खरी मजाही आहे !!

लेझीम च्या खेळासाठी लागते ती फक्त एक पातळ लाकडी काठी आणि त्याला लावलेल्या ,मंजुळ आवाज करणार्या झान्झेसारख्या पातळ धातूच्या छोट्या गोल तबकड्या!!…इतक्या साध्या आणि लहान उपकरणामध्ये अफाट ताकद आहे …। ताल आहे … लय आहे …. पाहणार्याला आणि खेळणार्याला मंत्रमुग्ध करून टाकण्याची शक्ती आहे ……. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या खेळाला स्त्री पुरुष असा भेद नाही …. कोणीही , कितीही वयाचा व्यक्ती स्त्री वा  पुरुष लेझीम खेळू शकतो !!

तर असा हा बहुरंगी  लेझीमचा  खेळ !…. या खेळात नाट्य , नृत्य , आनंद ,पराक्रम , कसरत , संघ भावना सारे काही आहे ……. आणि अगदी सोपे सांगायचे तर … या    खेळात  "मराठी  संस्कृती " आहे …।   "महाराष्ट्र "आहे … आणि म्हणून लेझीम प्रत्येक मराठी माणसाच्या " मनात " आहे ….! आणि कायमच राहील !!

----------------'------लेखन - हर्षल देशपांडे













Wednesday, February 24, 2016

वेदांचे शुभ मंत्र घोष घडता "व्रतबंध" समयावरी …. 
होती ब्राह्मण बालके "द्विज "खरी याची मुहुर्तावरी !
मंगल या सत्कारणे सिद्ध हा "वेदान्त "झाला स्वतः !
प्रेमाने व्रतबंध करण्या तया शुभकाळ आला आता !

यावे श्रीगणनायका शिवसुता कार्यास या सत्वरी । 
यावे श्री कुलदेवते भगवती श्री सप्त श्रुङ्गेश्वरी !
यावे मंगल वेद मंत्रांसवे विप्रादिकांनी स्वये । 
यावे आशिष द्यावया स्वजनहो सद्धर्म कार्यान्वये !!


charolya....four line poems

असा कसा मनास हा 
तुझाच ध्यास राहतो ?
तुझाच भास आजही 
सभोवताली राहतो ? …  १

तो तिथे होता कडेला 
वाळलेला वृक्ष मोठा 
आयुष्य सरलेले तरीही 
सावली पसरून होता !! 







Saturday, February 13, 2016

valentines day !!

पाहाल तेथे आता येईल
रंग उमलुनी लालच लाल
हसतील डोळे , होतील आणि
हळूच गुलाबी गोरे गाल !!

हातांमध्ये हात गुंफतील …
नजरेलाही नजरा मिळतील !
पाहाल तेथे रंग प्रीतीचे …
सर्व दिशांना गुलाब लाल !!

प्रेमाचा हा दिवस असा कि
सुर्याहुनही होईल लाल !
जागोजागी प्रेम पताका
मना मनांतून गुलाब लाल !!

हसतील कोणी खुश होऊनी
करता त्यांचा कुणी स्वीकार !!
कुणी एकटे उदास होईल
मिळता त्याला थंड नकार !!

कुठे कुणाला मिळेल सोबत
मिळेल सुंदर प्रेमळ संगत !
आणि कुणाचे प्रेम भंगता 
होतील त्याचे अवघड हाल !!

प्रेम दिवस हा विचित्र मोठा
तरीही याची भूल पडे !
प्रेमासाठी आसुसलेले
सारे  फिरतील आज खुशाल !!
------- हृदयामधुनी  गुलाब लाल …!!

-----------------लेखन - हर्षल  (१३/०२/२०१६ )










Thursday, February 4, 2016

Suresh bhat ...!!

अवघ्या वीजा मी झेलल्या … सगळी उन्हे मी सोसली !
मज सांग आयुष्या ,आता अजुनीही काही राहिले ?

अजुनी कसा हा तेवतो ,मग मंद आशेचा दिवा?
आता मला फसवायला ,कुठले निमंत्रण राहिले ??

होता न साधा एवढा ,जो शब्द मी तुजला दिला … 

एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले !!

ओसाड माझे घर तसे नाही पहाण्यासारखे !
हे आसवांचे तेवढे अद्याप तोरण राहिले !!
                    ------------- सुरेश भट -- ( स्वैर बदल )

Monday, February 1, 2016

Aadhar !!

सारे जुने नव्याने 
भेटून रोज जाते 
एकांत अंतरीचा 
ढवळून दूर होते !!

कोठे कसातरी मी 
वेचून सुख थोडे 
हसता जरा कुठेसे 
नियतीस दु:ख होते !!

सल आतले उराचे 
कोणासमोर न्यावे  !
दुनियेत "आपलेसे" 
कोणास या म्हणावे ?





Thursday, January 14, 2016

Makar sankrant !!!!

तिळाला मिळे गोडवा हा गुळाचा
तसा राहू दे गोडवा हा प्रीतीचा !!

जसे वाटते गोड तिळगुळ खाता
तसे वाटू दे गोड आयुष्य आता !!

मनातील चिंता तुझ्या सर्व जावो !
तुला प्रेम, सौजन्य,आनंद  लाभो !

मनातील इच्छा तुझ्या पूर्ण होवो ।
तुझे हासणे गोड नेहेमीच राहो !!

संक्रांत येता मने ही जुळावी !!
जुनी  प्रीत आपुली नव्याने कळावी !!

--------मकर संक्रांत प्रेमळ शुभेच्छा …--
-----'--------लेखन - हर्षल -------