Thursday, February 4, 2016

Suresh bhat ...!!

अवघ्या वीजा मी झेलल्या … सगळी उन्हे मी सोसली !
मज सांग आयुष्या ,आता अजुनीही काही राहिले ?

अजुनी कसा हा तेवतो ,मग मंद आशेचा दिवा?
आता मला फसवायला ,कुठले निमंत्रण राहिले ??

होता न साधा एवढा ,जो शब्द मी तुजला दिला … 

एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले !!

ओसाड माझे घर तसे नाही पहाण्यासारखे !
हे आसवांचे तेवढे अद्याप तोरण राहिले !!
                    ------------- सुरेश भट -- ( स्वैर बदल )

No comments:

Post a Comment