Sunday, August 14, 2016

कधी कधी उत्तरे नसणारे प्रश्न पडतात ..
आणि कधी कधी सुटलेल्या 
प्रश्नांची उत्तरे हरवून जातात !
आयुष्यभर जे जपलेले असते ते कधी कधी 
एका क्षणात उध्वस्त होते ...
तर कधी कधी जे वाटले ही नव्हते 
तेच अचानक मिळते !

सध्या चांगल्या लोकांसाठी जगणे
तसे सोपे रहिलेले नाहिये हे मान्य  !
परंतु ह्या सगळ्या विचित्र परिस्थितीत 
एकच गोष्ट स्थिर असावी आणि ती म्हणजे
आपला चांगुलपणा आणि आपले चारित्र्य !!
माणसे बदलतील ....जीवलग लोक दूर जातील ...
जुनी नाती तुटतील.. नवी जुळतील !!
संकटे येतील अथवा सुख मिळेल ..!!
काहीही आघात झाले तरी आपण
आपला चांगला स्वभाव सोडू नये !
 परमेश्वरापुढें आपली किंमत आपण
केलेल्या त्यागावर अवलंबून असते !
स्वार्थावर नाही !!

No comments:

Post a Comment