Saturday, December 2, 2017

अनिश्चय !!

जे चालते आहे ते कसे याचे भान नसावे आणि जे मिळते आहे तेही कसे याचे ज्ञान नसावे ही खरी शोकांतिका आहे असे वाटते !
 ईश्वरीय इच्छा कशी उत्पन्न होऊन कार्य करते हे मानवाला कळणे दुर्बोध होय ! कर्म केली जाताता , विकार वापरले जातात ... आनंद ..लोभ .. प्रेम या सगळ्या प्रकृती पसरल्या जातात ! बोध आणि अबोध या सर्वांतून एकमात्र प्रबळ निष्कर्ष काढून सत्य समजावे ते तर होणे नाही ! 
एकच म्हणणे उरते ....
"" नैतद जानामि कश्चित ! नापरम वा परम ! 
किमर्थम आत्मसुखम अत्र किमर्थम व्यामोहमत्र वा ?!""