स्व-संवाद ...!!
अंधारावर प्रकाश अलगद जिंकत जातो ...सुखाचा दु:खावर अल्लड वेढा पडतो !
चंद्रमंडलावर मेघांचा ,सरोवरांवर कारंडवांचा
,सागरनिळाईवर सांध्यछायांचा आणि
मनावर ...प्रच्छन्न समाधानाचा आणि आभासी वास्तवांचा .... असाच वेढा !!
सत्य शोधण्यासाठी सुर्याकडे पहात ;आत्मबलाने
पाय उचलून देवयान पंथावरून चालता चालता
देहाच्या प्रत्येक शबल उर्मी ..संयमीत करीत ;
वेदद्रष्ट्या ऋषीसारखे स्वार्थापासून संपूर्ण निष्कासित होऊन असीम प्रज्ञेच्या निजानंदात राहायचे की ,
अमूर्त काळाला नमन करीत त्याच्या प्रवाहात विश्वाबरोबर वहात जायचे आणि असंख्यातील एक तसाच "नगण्य " जीव म्हणून अनावर आयुष्य आवरता आवरता सरून जायचे.... हा एकच प्रश्न आहे !!
याचे उत्तर मिळाले तरीही, तसा काही मोठा
भेद बाह्य-विश्वात होईल असे नाही !! ...
पण खरे सांगायचे तर आपणच विश्वाचे द्रष्टे असतो !
त्यामुळे बदल आपल्या"आत"झाला ;
तर तसेही "बाहेरचे"सगळेच संदर्भ बदलतातच !!
--्---्-- हर्षल (जानेवारी २०१९ )
अंधारावर प्रकाश अलगद जिंकत जातो ...सुखाचा दु:खावर अल्लड वेढा पडतो !
चंद्रमंडलावर मेघांचा ,सरोवरांवर कारंडवांचा
,सागरनिळाईवर सांध्यछायांचा आणि
मनावर ...प्रच्छन्न समाधानाचा आणि आभासी वास्तवांचा .... असाच वेढा !!
सत्य शोधण्यासाठी सुर्याकडे पहात ;आत्मबलाने
पाय उचलून देवयान पंथावरून चालता चालता
देहाच्या प्रत्येक शबल उर्मी ..संयमीत करीत ;
वेदद्रष्ट्या ऋषीसारखे स्वार्थापासून संपूर्ण निष्कासित होऊन असीम प्रज्ञेच्या निजानंदात राहायचे की ,
अमूर्त काळाला नमन करीत त्याच्या प्रवाहात विश्वाबरोबर वहात जायचे आणि असंख्यातील एक तसाच "नगण्य " जीव म्हणून अनावर आयुष्य आवरता आवरता सरून जायचे.... हा एकच प्रश्न आहे !!
याचे उत्तर मिळाले तरीही, तसा काही मोठा
भेद बाह्य-विश्वात होईल असे नाही !! ...
पण खरे सांगायचे तर आपणच विश्वाचे द्रष्टे असतो !
त्यामुळे बदल आपल्या"आत"झाला ;
तर तसेही "बाहेरचे"सगळेच संदर्भ बदलतातच !!
--्---्-- हर्षल (जानेवारी २०१९ )