माझ्या लेखनातील एक छोटा उतारा ( -- *HARSHAL*)
*मुलीचा बाप*--
घरातले सगळे आवरत असतात...मुलीचे लग्न ठरलेय!
मग आवरआवरी हवीच!...
तो पण झीजत असतो... लग्न तारीख...खरेदी...सामान..मुहूर्त...काळजी...सगळे वाहत असते त्याच्या मनातून!
वर वर कडक दिसतोय. पण आत कुठेतरी धक्का बसलाय!..
दोन चार वेळा दिवसातून पोरीला हळूच बघून येतोय!
ती हसतेय ते बघून आतूनच खुश होतोय...आणि काळजाला घरे पाडून घेतोय!!
पाहुणे रावळे येतील आणि पोरीला बघतील...मग काय म्हणतील या विचाराने बाजारात फिरताना सुद्धा त्याचा पिच्छा पुरवलाय!...
चिमणी आपली...जन्मली तेंव्हा कशी होती...मग शाळा कॉलेजात गेली.....अक्खा जीवनपट उलगडतो त्याच्या डोळ्यांपुढे!!...
परत जीव कासावीस होतो!...
आता चिमणी जाणार बापाला सोडून.... कशी राहील? किती सुख दुःख पाहिल? कशी हसेल?कधी भेटेल?...असले सगळे प्रश्न उरात...अश्रू लपवत... साखरपुड्यापासून ते लग्नाच्या मांडवद्वारापर्यंत असंख्य कामे करतो हा माणूस!....
शेवटी ती सासरी जायला निघते...ती चिमणी..तो काळजाचा तुकडा...जिच्यासाठी अक्खे आयुष्य ओवाळून टाकले ती पोर..सासरी निघते!...चालली आता!!..एक वर्तुळ संपले! मुलगी फार फार दूर चालली!!..आता हक्क बदलले!...काळीज शरीरातून दूर दूर जाऊ लागले जणू!!..
आणि मग मात्र तो पार कोसळतो!..
...तो मुलीचा बाप...जन्मदाता! मुलीला सगळ्यांत मोठा आधार वाटणारा तिचा बाप !...
त्याचे डोळे भरून पूर येतात त्यांना !.पण ..तो अडवत नाही ते पाणी!.....
माया...ममता...प्रेम..सगळे शब्द वितळून गळ्याशी येतात!
"बाबा निघते हो...काळजी घ्या "म्हणून रडणारी ती त्याची पोर...त्याला सहन होत नाही!..काय बोलावे तिला हे सुचत नाही! आणि मग त्याचे अश्रूच बोलू लागतात!...
तिच्या सासरी तिला आश्वासन मिळेल का...तिला त्रास होईल का...तिचे सगळे लाड कोणी पुरवतील का?..तिला न सांगताच कोणी समजून घेईल का?..आपल्या मुलीला आपल्याऐवढी माया कोणी देईल का? आपल्यावर तिला जों निर्धास्त विश्वास वाटतो तसा सासरी कोणावर वाटेल का?...
हजारो प्रश्न!!...बापाला एकाचेही उत्तर मिळत नाही!..
मुलीला घट्ट मिठी मारून रडताना त्याचे एकही दुःख कमी होत नाही!...
सासरी चाललीये म्हणून आनंद...आणि कायमची अंतरली म्हणून आकाशभर दुःख!!....
असाच असतो मुलीचा बाप....!!.
त्याची तुलना कोणाशीही करता येत नाही!!..
---- लेखन -*- हर्षल! ( 2008)